मुंबई

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी चार महिलांना अटक

मुलगी एका रिक्षात बसल्याचे एका व्यक्तीने सांगितले. ही मुलगी खुशबू गुप्ता ऊर्फ खुशी हिच्यासोबत होती. त्या रिक्षात आणखीही महिला होत्या.

Swapnil S

ऐश्वर्या अय्यर/मुंबई

२४ मार्चच्या रात्री ५ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अवघ्या १२ तासांत चार महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फुगे घेण्यासाठी दुकानात गेली. मात्र, ती घरी परत आलीच नाही. त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. ही मुलगी एका रिक्षात बसल्याचे एका व्यक्तीने सांगितले. ही मुलगी खुशबू गुप्ता ऊर्फ खुशी हिच्यासोबत होती. त्या रिक्षात आणखीही महिला होत्या. तिच्या पालकांनी तत्काळ भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ चौकशी सूत्रे फिरवल्यानंतर खुशी हेच नाव माहिती पडले. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. तिचा मोबाईल क्रमांकाचे लोकेशन शोधायला सुरुवात केली. ती सापडल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. खुशी (१९) तिची मैत्रीण मैना दिलोद (३९) यांच्यासोबत ती अपहृत मुलगी दिसली. आरोपींनी तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्यासोबत चालण्यास सांगितले. ती मुलगी खुशी हिला ओळखत होती. या अल्पवयीन मुलीला या दिव्य कैलाश सिंग व पायल शहा या दोन महिलांना विकायचे होते. या महिलांना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. चारही महिलांना मंगळवारी कोर्टात सादर करण्यात येईल.

मोठी बातमी! अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा

Mumbai Tiranga March : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही मोर्चा होणारच! 'हा तरुणाईच्या विजयाचा जल्लोष'; ठाकरे बंधूंची घोषणा

'आता लवकर घरी परत ये...'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या भावना, Video

'लोकशाहीने कात टाकली...'; धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याण दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक, ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक