राष्ट्रीय

कर्नाटकात अपघातात १२ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत टाटा सुमोतील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे

नवशक्ती Web Desk

बंगळुरू : कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी चित्रावती ट्रॅफिक पोलीस ठाण्यासमोर घडली.

मृतांमध्ये ८ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर एक टँकर उभा होता. या टँकरला मागून येणाऱ्या टाटा सुमोने धडक दिली. जखमींना तत्काळ रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. दाट धुके असल्याने कारचालकाला रस्त्याच्या बाजूला असलेला टँकर दिसू शकला नाही. या दुर्घटनेत टाटा सुमोतील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर चिक्कबल्लापूर जनरल रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली