राष्ट्रीय

कर्नाटकात अपघातात १२ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत टाटा सुमोतील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे

नवशक्ती Web Desk

बंगळुरू : कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी चित्रावती ट्रॅफिक पोलीस ठाण्यासमोर घडली.

मृतांमध्ये ८ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर एक टँकर उभा होता. या टँकरला मागून येणाऱ्या टाटा सुमोने धडक दिली. जखमींना तत्काळ रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. दाट धुके असल्याने कारचालकाला रस्त्याच्या बाजूला असलेला टँकर दिसू शकला नाही. या दुर्घटनेत टाटा सुमोतील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर चिक्कबल्लापूर जनरल रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Iran vs US-Israel War: पत्नीशी फोनवर बोलताना मोठा स्फोट! सौदीतील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू