राष्ट्रीय

बलुचिस्तानमध्ये दोन बॉम्बस्फोटांत ३० ठार 'निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हल्ले'

पाकिस्तानमध्ये गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अशांत बलुचिस्तान प्रांतात झालेल्या दोन स्फोटांत किमान ३० जण ठार झाले आणि ४० हून अधिक जण जखमी झाले.

Swapnil S

कराची : पाकिस्तानमध्ये गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अशांत बलुचिस्तान प्रांतात झालेल्या दोन स्फोटांत किमान ३० जण ठार झाले आणि ४० हून अधिक जण जखमी झाले. बुधवारच्या हल्ल्यांत हल्लेखोरांनी निवडणूक कार्यालयांना लक्ष्य बनवले आहे. या दुहेरी स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने किंवा व्यक्तीने स्वीकारलेली नाही. बलुचिस्तानचे गृहमंत्री जान अचकझाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात या हल्ल्यांचा निषेध केला आणि वेळापत्रकानुसार निवडणुका घेतल्या जातील, अशी घोषणा केली.

पहिल्या घटनेत बलुचिस्तानच्या पिशीन जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार अस्फंदयार खान काकर यांच्या कार्यालयाबाहेर झालेल्या शक्तिशाली स्फोटात २० लोक ठार आणि ३० जण जखमी झाले. हा बॉम्ब मोटारसायकलला जोडलेला होता आणि काकर यांच्या निवडणूक कार्यालयाजवळ ठेवला होता. त्याचा दूरस्थपणे स्फोट करण्यात आला. काकर हे पिशीनमधून प्रांतीय विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक लढवत आहेत आणि स्फोट झाला तेव्हा ते उपस्थित नव्हते.

एका तासापेक्षा कमी कालावधीनंतर किल्ला अब्दुल्ला परिसरात जमियत-उलेमा इस्लाम-पाकिस्तानच्या निवडणूक कार्यालयाबाहेर आणखी एक स्फोट झाला. त्यामध्ये १० लोकांचा मृत्यू झाला आणि २२ जण जखमी झाले. जमियत-उलेमा इस्लाम-पाकिस्तान निवडणूक कार्यालयाबाहेर स्फोटही अशाच पद्धतीने करण्यात आला. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी क्वेट्टा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवर असलेल्या बलुचिस्तानमध्ये हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. मंगळवारी या प्रांतातील विविध भागात सुरक्षा चौक्या, निवडणूक प्रचार कार्यालये आणि रॅलींवर १० ग्रेनेड हल्ले करण्यात आले.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग