राष्ट्रीय

कागद आणि पेपरबोर्डच्या आयातीत ३७ टक्के वाढ; ‘मेक इन इंडिया’ धोरणावर परिणाम

मालाची आयात आर्थिक वर्ष २३ मध्ये २५ टक्क्यांनी वाढून १.४४ दशलक्ष टन झाली आहे आणि एप्रिल-डिसेंबरमधील उलाढालही त्यापेक्षा जास्त झाली आहे

Swapnil S

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबरमध्ये कागद आणि पेपरबोर्डची आयात ३७ टक्क्यांनी वाढून सुमारे १.४७ दशलक्ष टन झाली आहे. त्यामुळे स्थानिक पेपर मिलना फटका बसला आहे, असे एका उद्योग संस्थेने रविवारी सांगितले.

भारतीय पेपर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयपीएमए) ने डीजीसीआयॲण्डएस डेटाचा हवाला देऊन सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कागद आणि पेपरबोर्डची आयात सुमारे १.०७ दशलक्ष टन होती.

आयपीएमएने एका निवेदनात म्हटले आहे की, मालाची आयात आर्थिक वर्ष २३ मध्ये २५ टक्क्यांनी वाढून १.४४ दशलक्ष टन झाली आहे आणि एप्रिल-डिसेंबरमधील उलाढालही त्यापेक्षा जास्त झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत १० हजार कोटी रुपयांच्या प्रचंड प्रमाणात कागद आणि पेपरबोर्डची आयात होत असल्याने ‘मेक-इन-इंडिया’ मोहिमेवर परिणाम होत आहे. तसेच ५ लाख शेतकऱ्यांचा रोजगार हिरावला जात असून ते कृषी, कृषी वनीकरण, यांद्वारे देशांतर्गत कागद उद्योगाशी संलग्न आहेत, असे आयपीएमएचे अध्यक्ष पवन अग्रवाल म्हणाले.

Bhiwandi : 'कृपया गुटखा मागू नका'; तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर पानटपऱ्यांवर झळकले फलक

FSSAI चा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी स्टेपल पिन, धातूच्या तारांवर बंदी; अन्यथा होणार कारवाई

Varanasi : 'ऑर्डर, ऑर्डर! आज मीच न्यायाधीश' म्हणत न्यायाधीशांच्या खुर्चीत बसली महिला; कोर्टात तासभर गोंधळ, Video व्हायरल

IAF AN-32 Aircraft Crash : जोरहाट विमान दुर्घटनेत ५ जवानांचा मृत्यू; सहवैमानिक जखमी, हवाई दलाकडून चौकशीचे आदेश

सोशल मीडियावर मॅगीची चर्चा; अळ्या आढळल्याचा आरोप फेटाळत नेस्ले इंडियाचे स्पष्टीकरण, FSSAI कडून चौकशी सुरू