राष्ट्रीय

कागद आणि पेपरबोर्डच्या आयातीत ३७ टक्के वाढ; ‘मेक इन इंडिया’ धोरणावर परिणाम

मालाची आयात आर्थिक वर्ष २३ मध्ये २५ टक्क्यांनी वाढून १.४४ दशलक्ष टन झाली आहे आणि एप्रिल-डिसेंबरमधील उलाढालही त्यापेक्षा जास्त झाली आहे

Swapnil S

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबरमध्ये कागद आणि पेपरबोर्डची आयात ३७ टक्क्यांनी वाढून सुमारे १.४७ दशलक्ष टन झाली आहे. त्यामुळे स्थानिक पेपर मिलना फटका बसला आहे, असे एका उद्योग संस्थेने रविवारी सांगितले.

भारतीय पेपर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयपीएमए) ने डीजीसीआयॲण्डएस डेटाचा हवाला देऊन सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कागद आणि पेपरबोर्डची आयात सुमारे १.०७ दशलक्ष टन होती.

आयपीएमएने एका निवेदनात म्हटले आहे की, मालाची आयात आर्थिक वर्ष २३ मध्ये २५ टक्क्यांनी वाढून १.४४ दशलक्ष टन झाली आहे आणि एप्रिल-डिसेंबरमधील उलाढालही त्यापेक्षा जास्त झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत १० हजार कोटी रुपयांच्या प्रचंड प्रमाणात कागद आणि पेपरबोर्डची आयात होत असल्याने ‘मेक-इन-इंडिया’ मोहिमेवर परिणाम होत आहे. तसेच ५ लाख शेतकऱ्यांचा रोजगार हिरावला जात असून ते कृषी, कृषी वनीकरण, यांद्वारे देशांतर्गत कागद उद्योगाशी संलग्न आहेत, असे आयपीएमएचे अध्यक्ष पवन अग्रवाल म्हणाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री