प्रातिनिधिक फ्रीपिक फोटो
राष्ट्रीय

बिहारमध्ये ४३ जणांचा बुडून मृत्यू; १५ जिल्ह्यांमध्ये 'जीवितपुत्रिका' महोत्सवातील दुर्घटना

आपल्या मुलाबाळांचे कल्याण व्हावे यासाठी महिला उपवास करतात आणि मुलांसह नदीमध्ये पवित्र स्नान करतात.

Swapnil S

पाटणा : बिहारमध्ये जीवितपुत्रिका महोत्सवानिमित्त नदीत पवित्र स्नानासाठी गेलेल्या एकूण ४३ जणांचा विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला असून त्यामध्ये ३७ मुलांचा समावेश आहे, तर अन्य तीन जण बेपत्ता झाले आहेत, असे गुरुवारी राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

बिहारमधील १५ जिल्ह्यांमध्ये बुधवारी जीवितपुत्रिका महोत्सवादरम्यान या घटना घडल्या आहेत. आपल्या मुलाबाळांचे कल्याण व्हावे यासाठी महिला उपवास करतात आणि मुलांसह नदीमध्ये पवित्र स्नान करतात. आतापर्यंत ४३ जणांचे मृतदेह मिळाले असून उर्वरितांचा कसून शोध घेतला जात आहे, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पूर्व आणि पश्चिम चंपारण, नालंदा, औरंगाबाद, कैमूर, बक्सर, सिवान, रोहतास, सरण, पाटणा, वैशाली, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, गोपाळगंज आणि अरवाल जिल्ह्यात भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक