प्रातिनिधिक फ्रीपिक फोटो
राष्ट्रीय

बिहारमध्ये ४३ जणांचा बुडून मृत्यू; १५ जिल्ह्यांमध्ये 'जीवितपुत्रिका' महोत्सवातील दुर्घटना

आपल्या मुलाबाळांचे कल्याण व्हावे यासाठी महिला उपवास करतात आणि मुलांसह नदीमध्ये पवित्र स्नान करतात.

Swapnil S

पाटणा : बिहारमध्ये जीवितपुत्रिका महोत्सवानिमित्त नदीत पवित्र स्नानासाठी गेलेल्या एकूण ४३ जणांचा विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला असून त्यामध्ये ३७ मुलांचा समावेश आहे, तर अन्य तीन जण बेपत्ता झाले आहेत, असे गुरुवारी राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

बिहारमधील १५ जिल्ह्यांमध्ये बुधवारी जीवितपुत्रिका महोत्सवादरम्यान या घटना घडल्या आहेत. आपल्या मुलाबाळांचे कल्याण व्हावे यासाठी महिला उपवास करतात आणि मुलांसह नदीमध्ये पवित्र स्नान करतात. आतापर्यंत ४३ जणांचे मृतदेह मिळाले असून उर्वरितांचा कसून शोध घेतला जात आहे, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पूर्व आणि पश्चिम चंपारण, नालंदा, औरंगाबाद, कैमूर, बक्सर, सिवान, रोहतास, सरण, पाटणा, वैशाली, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, गोपाळगंज आणि अरवाल जिल्ह्यात भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?

अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...

"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव

पेट्रोल पंपांमध्ये भारत जगात तिसरा! संख्या १ लाखांवर, १० वर्षांत दुप्पट वाढ; टॉप २ देश कोणते?

Mumbai: शौचालय वापराचेही प्रमाणपत्र द्यावे लागणार; इच्छुकांची धावपळ सुरू