राष्ट्रीय

CM केजरीवालांसाठी तिहार जेलमध्ये मेडिकल बोर्ड, AIIMS चे ५ डॉक्टर करणार हेल्थ चेकअप

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिले. या पत्रात केजरीवाल यांच्यासाठी तिहार जेल हे टॉर्चर रूम झाले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी पत्रातून केला.

Swapnil S

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी एम्सच्या ५ डॉक्टरांची टीम तयार करण्याचे आदेश न्यायालयाने २३ एप्रिल रोजी दिले होते. यानुसार, ५ डॉक्टरांची टीम तयार केली असून डॉ. निखिल टंडन हे डॉक्टरांच्या टीमचे प्रमुख आहेत. निखिल टंडन हे तेच डॉक्टर आहेत, ज्यांना तिहार तुरुंगाच्या डीजींच्या पत्रावरून केजरीवाल यांच्या हेल्थ चेकअपसाठी एम्सने आधीच नियुक्त केले होते

केजरीवाल यांना सोमवारपासून (२२ एप्रिल) दुपारी जेवण्यापूर्वी २ युनिट इन्सुलिनचे डोस आणि रात्रीच्या जेवणापूर्वी २ युनिट इन्सुलिनचे डोस दिले जात आहेत. आता लवकरच मेडिकल बोर्डाच्या ५ डॉक्टरांची टीम तिहार तुरुंगात जाऊन केजरीवाल यांची तपासणी करू शकते.

तिहार तुरुंगातील डॉक्टर केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी दररोज तपासत असून निरीक्षण करत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, केजरीवाल यांना फक्त घरचे जेवण दिले जात आहे. सध्या केजरीवाल यांची प्रकृती स्थिर आहे.

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी गुरुवारी (२५ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिले. या पत्रात केजरीवाल यांच्यासाठी तिहार जेल हे टॉर्चर रूम झाले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी पत्रातून केला होता.

संजय सिंह यांचे गंभीर आरोप -

संजय सिंह यांनी पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) हे चोवीस तास केजरीवाल यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांकडून त्यांना मिळाली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांची हेरगिरी केली जात असून त्यांना २३ दिवसांपासून इन्सुलिन देण्यात आले नव्हते, असेही त्यांनी पत्रात लिहिले होते. दिल्लीच्या जनतेची सेवा करणे हा केजरीवाल यांचा गुन्हा आहे का? की त्यांच्याशी वैयक्तिक वैर आहे का? जीव घेऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवायचे कारस्थान आहे का? हे सर्व पंतप्रधान कार्यालय आणि एलजीच्या देखरेखीखाली सुरू आहे, याचे मला दुःख वाटत आहे, असे संजय सिंह यांनी पत्रात म्हटले होते.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...