राष्ट्रीय

गंगा नदीत ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली ; 10 प्रवासी बेपत्ता

या अपघातातील 45 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही 10 प्रवासी बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे

वृत्तसंस्था

बिहारची राजधानी पाटणाजवळील मणेर गावात एका बोटीला अपघात झाला आहे. शेरपूर घाटाजवळील गंगा नदीत ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातातील 45 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही 10 प्रवासी बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफ या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहे.

दानापूरचे एसडीएम घटनास्थळी हजर आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की 10 लोक बेपत्ता असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. बोटीवरील लोक दाऊदपूरचे रहिवासी आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीच्या एका किनाऱ्यावरून तीन बोटीतून चारा कापून काही लोक आपापल्या घरी परतत होते. दरम्यान, नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन बोटींची धडक झाली. बोटीवरील बहुतांश लोक दानापूर शाहपूर परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूला मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमाव हटवून शोध सुरू केला. संबंधित घटनेची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

BMCचा मोठा निर्णय : अधिकृत फेरीवाल्यांना मिळणार QR कोड प्रमाणपत्र; बेकायदेशीर विक्रेत्यांना मोठा इशारा

BMC Budget 2026: ९० मिनिटांचा प्रवास आता फक्त २० मिनिटांत; मेगा रोड प्रोजेक्ट्समुळे मुंबईकरांना फायदा

Mumbai : राणीबागेत लवकरच गुजरातच्या सिंहाची गर्जना; सिंहाच्या मागणीसाठी मुंबईच्या महापौरांचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

Mumbai : प्रवाशांना दिलासा! विधानभवन मेट्रो स्थानकाचे B-४ गेट सुरू; B-५ वर निर्बंध कायम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

मातृत्वाला काळिमा! रडणाऱ्या तान्ह्या बाळाच्या तोंडात कोंबला कापडाचा बोळा अन् जिवंत जाळलं