राष्ट्रीय

शंभू सीमेवर विषप्राशन करून शेतकऱ्याने केली आत्महत्या

आपल्या विविध मागण्या धसास लावण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शंभू सीमेवर शेतकरी निदर्शने करीत आहेत.

Swapnil S

पतियाळा : आपल्या विविध मागण्या धसास लावण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शंभू सीमेवर शेतकरी निदर्शने करीत आहेत. त्यापैकी एका शेतकऱ्याने गुरुवारी विषप्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. निदर्शनाच्या ठिकाणी तीन आठवड्यांत घडलेली ही दुसरी घटना असल्याचे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले.

विषप्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव रेशमसिंग (५५) असे असून तो तरण तारण जिल्ह्यातील पहुविंद येथील रहिवासी आहे. रेशमसिंग याला तातडीने पतियाळातील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे तो मरण पावला. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवत नसल्याने रेशमसिंग निराश झाला होता, असे शेतकऱ्यांचे नेते तेजवीरसिंग यांनी सांगितले. यापूर्वी १८ डिसेंबर रोजी रणजोधसिंग या शेतकऱ्याने शंभू सीमेवर आत्महत्या केली होती.

गेले वर्षभर शेतकऱ्यांचे आंदोलन

संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली पंजाब आणि हरयाणा शंभू सीमेवर १३ फेब्रुवारीपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पिकांच्या किमान हमीभावाला हमी द्यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: १९ नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; बारामती, अंबरनाथमध्ये पुन्हा गोंधळ

मुंबईच्या नावासाठी उद्धव ठाकरे कडाडले, 'जिथे-जिथे बॉम्बे लिहलंय तिथे...

BLO च्या मानधनात वाढ, पण राज्य सरकारकडून विलंब; निवडणूक आयोगाची तक्रार

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; बूथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ

Mumbai : पोलीस कॉन्स्टेबलच्या गर्भवती पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल