राष्ट्रीय

शंभू सीमेवर विषप्राशन करून शेतकऱ्याने केली आत्महत्या

आपल्या विविध मागण्या धसास लावण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शंभू सीमेवर शेतकरी निदर्शने करीत आहेत.

Swapnil S

पतियाळा : आपल्या विविध मागण्या धसास लावण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शंभू सीमेवर शेतकरी निदर्शने करीत आहेत. त्यापैकी एका शेतकऱ्याने गुरुवारी विषप्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. निदर्शनाच्या ठिकाणी तीन आठवड्यांत घडलेली ही दुसरी घटना असल्याचे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले.

विषप्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव रेशमसिंग (५५) असे असून तो तरण तारण जिल्ह्यातील पहुविंद येथील रहिवासी आहे. रेशमसिंग याला तातडीने पतियाळातील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे तो मरण पावला. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवत नसल्याने रेशमसिंग निराश झाला होता, असे शेतकऱ्यांचे नेते तेजवीरसिंग यांनी सांगितले. यापूर्वी १८ डिसेंबर रोजी रणजोधसिंग या शेतकऱ्याने शंभू सीमेवर आत्महत्या केली होती.

गेले वर्षभर शेतकऱ्यांचे आंदोलन

संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली पंजाब आणि हरयाणा शंभू सीमेवर १३ फेब्रुवारीपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पिकांच्या किमान हमीभावाला हमी द्यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

मुंबईसह राज्यभरात उन्हाचा चटका; थंडीने गाशा गुंडाळला; आणखी काही दिवस उष्णतेचा इशारा

एसटीच्या 'शिवनेरी' धावणार राज्यभरात; २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेसची खरेदी

व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे घटस्फोट मंजूर होत नाही; नाशिकच्या कौटुंबिक कोर्टाचा आदेश रद्दबातल

Mumbai : फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार