राष्ट्रीय

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यात भीषण अपघात ; ७ ठार तर ५ जण जखमी

नवशक्ती Web Desk

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यात बुधवारी झालेल्या रस्ते अपघातात सात जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी काको पठारजवळील बोर्डीरक तिनियाली येथे पीडितांच्या वाहनाची एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकबरोबर समोरासमोर धडक झाली. त्यात सात जण ठार झाले आणि पाच जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात ट्रकचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असे आढळले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस