पश्चिम बंगाल राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांचे संग्रहित छायाचित्र पीटीआय
राष्ट्रीय

प. बंगाल राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप, सुप्रीम कोर्ट ‘कलम ३६१’ची तपासणी करणार

राज्यपालांना कोणत्याही प्रकारच्या फौजदारी कारवाईपासून सरसकट कवच असलेल्या घटनेतील ‘कलम ३६१’च्या रूपरेषेची तपासणी करण्याचे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले.

Swapnil S

नवी दिल्ली : राज्यपालांना कोणत्याही प्रकारच्या फौजदारी कारवाईपासून सरसकट कवच असलेल्या घटनेतील ‘कलम ३६१’च्या रूपरेषेची तपासणी करण्याचे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले.

पश्चिम बंगालच्या राजभवनमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या एका महिलेने राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी आपला विनयभंग केल्याची आणि तेथील अधिकाऱ्यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवल्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वरील बाब मान्य केली.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने या महिलेच्या याचिकेवरून पश्चिम बंगाल सरकारला नोटीस पाठविली असून त्या महिलेला केंद्र सरकारला पक्षकार करण्याचेही स्वातंत्र्य दिले आहे. घटनात्मक प्रश्नांवर ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही पीठाने व्यक्त केली आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली