ANI
राष्ट्रीय

२०२६ मध्ये तमिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास

२०२६ मध्ये होणाऱ्या तमिळनाडू, प. बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. मदुराई येथे झालेल्या कार्यक्रमात शहा बोलत होते.

Swapnil S

मदुराई : २०२६ मध्ये होणाऱ्या तमिळनाडू, प. बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

मदुराई येथे झालेल्या कार्यक्रमात शहा बोलत होते. शहा यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, तमिळनाडूत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता द्रमुकचा पराभव करणार आहे. भाजप व अण्णाद्रमुक एकत्रितपणे तमिळनाडूत रालोआ सरकार स्थापन करणार आहोत. द्रमुक सरकारला सत्तेतून हटवण्याचे व बदलाचे संकेत मिळत आहेत. तमिळनाडूतील जनतेला आता बदल हवा असून भाजप कार्यकर्ते त्यासाठी पूर्ण तयार आहेत, असे ते म्हणाले.

शहा म्हणाले की, एम. के. स्टालिन सांगतात, अमित शहा हे द्रमुकला हरवू शकत नाही. ते सत्य बोलत आहेत. मी नाही तर तमिळनाडूची जनताच तुम्हाला हरवेल. गेल्या १० वर्षांत भाजप सरकारने तमिळनाडूला ६.८० लाख कोटी दिले. तरीही मुख्यमंत्री स्टालिन विचारतात, केंद्राने तमिळनाडूला काय दिले? मी मुख्यमंत्री स्टालिन यांना आव्हान देतो की, २०२१ मध्ये द्रमुकने निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली का? हे जाहीररीत्या सांगावे, असे ते म्हणाले.

वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यास तमिळमधून करा

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यास तमिळमधून सुरू करा. पंतप्रधान मोदी यांनी संसदेत सेंगोल स्थापन करून तमिळनाडूचा सन्मान केला. त्यासाठी स्टालिन हे पंतप्रधानांना पत्र लिहून धन्यवाद देतील, अशी मला आशा आहे.

दरम्यान, अमित शहा यांनी प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजा केली. मी तमिळ भाषेतून बोलू शकत नाही याबाबत मला खेद वाटतो, असे ते म्हणाले.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी