अंदमान समुद्रात बोट उलटली; रोहिंग्यांसह २५० हून अधिक जण बेपत्ता X (@airnews_mumbai)
राष्ट्रीय

अंदमान समुद्रात बोट उलटली; रोहिंग्यांसह २५० हून अधिक जण बेपत्ता

बांगलादेशातून मलेशियाच्या दिशेने जाणाऱ्या निर्वासितांची एक बोट अंदमान समुद्रात उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांसह किमान २५० जण बेपत्ता असल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित आणि स्थलांतरित संस्थांनी (यूएनएचसीआर आणि आयओएम) व्यक्त केली आहे.

Swapnil S

ढाका : बांगलादेशातून मलेशियाच्या दिशेने जाणाऱ्या निर्वासितांची एक बोट अंदमान समुद्रात उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांसह किमान २५० जण बेपत्ता असल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित आणि स्थलांतरित संस्थांनी (यूएनएचसीआर आणि आयओएम) व्यक्त केली आहे.

९ एप्रिल रोजी नऊ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये तीन रोहिंग्या आणि सहा बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. बांगलादेशी ध्वजवाहक जहाज 'एम.टी. मेघना प्राइड' हे चितगाववरून इंडोनेशियाकडे जात असताना, जहाजावरील कर्मचाऱ्यांना समुद्रात काही लोक तरंगताना दिसले. त्यांनी तातडीने या नऊ जणांना वाचवून टेकनाफ पोलिसांच्या हवाली केले. सध्या हे सर्व नऊ बचावलेले नागरिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रवासामागची कारणे

म्यानमारमधील रखाइन प्रांतात सुरू असलेला हिंसाचार आणि निर्वासित छावण्यांमधील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे रोहिंग्या नागरिक असुरक्षित आहेत. उत्तम रोजगार आणि चांगल्या आयुष्याच्या आशेने हे निर्वासित दलाल आणि तस्करांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडतात आणि अशा जोखमीच्या प्रवासाचा मार्ग निवडतात.

Mumbai : परळ स्थानकाचे पुन्हा नूतनीकरण; विस्तारीकरणासाठी नव्या बांधकामावर हातोडा?

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

देवनार कचरा प्रकल्पाला बसणार मोठा आर्थिक भुर्दंड; पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन; दंडाची नव्याने गणना करण्याचे NGT चे आदेश

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण

IPL 2026 : मुंबई रोखणार पंजाबचा विजयरथ? वानखेडेवर आज उभय संघ आमनेसामने; रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम कायम