राष्ट्रीय

कलाकारांनी समाज एकसंध बनवावा -मोहन भागवत

कलेचा उद्देश हा सुधारण्याचे काम करणारा आहे, समाज एकसंध बनवणे हा आहे. आपला समाज संपूर्ण जगाला स्वतःची उदाहरणे देऊन जीवनाची शिकवण सांगू शकेल असा बनवा, यासाठी संपूर्ण समाजाची गरज आहे.

Swapnil S

बंगळुरू : कलेचा उद्देश हा सुधारण्याचे काम करणारा आहे, समाज एकसंध बनवणे हा आहे. आपला समाज संपूर्ण जगाला स्वतःची उदाहरणे देऊन जीवनाची शिकवण सांगू शकेल असा बनवा, यासाठी संपूर्ण समाजाची गरज आहे. कलाविश्वाने संघटित होऊन या दिशेने काम करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले. मात्र सध्याच्या स्थितीत तसे घडत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या रा. स्व. संघाशी संलग्न असलेल्या 'संस्कार भारती'तर्फे येथील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमात आयोजित अखिल भारतीय कलासाधक संगमच्या समापन कार्यक्रमात ते बोलत होते.

देशातील कलाकारांनी संघटित होऊन समाजाच्या हिताची भूमिका समजून घेऊन त्यांनी त्यांच्या कलेचा सराव करावा, असे आवाहन कला सरावण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कलाकार आज त्यांच्या कलेची सामाजिक जीवनातील खरी भूमिका समजून न घेता कला जोपासत आहेत. समाजाच्या कल्याणासाठी ‘कार्यकर्ता’ म्हणून नि:स्वार्थपणे काम करण्यास त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, असे अनेक कलाकार आहेत जे प्रामाणिकपणे आपली कला जोपासत आहेत, पण ते वैयक्तिक असू नये. जर कला ही समाजाभिमुख असेल तर ती ‘अर्थहीन वादात’ अडकणार नाही किंवा लोकांमध्ये फूट पाडणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

एलआयसी फिनटेकमध्ये उतरणार; गुंतवणूक अधिक वाढविणार - दोराईस्वामी

लग्न झालं, हनिमूनला निघाले अन्... ; अमेरिकेत भारतीय वंशाच्या पायलटचा दुर्दैवी मृत्यू, थोडक्यात बचावली पत्नी

Mumbai : मान्सूनपूर्व तयारीला वेग; ८० टक्क्यांहून अधिक नालेसफाई पूर्ण, महापौर रितू तावडे यांची माहिती

जव्हार : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक; प्रत्येकी ५०० रुपये उकळल्याचा आरोप

देशांतर्गत पर्यटकांकडून यंदाच्या उन्हाळ्यात लक्झरी हॉटेलची मागणी वाढली; पर्यटकांकडून नजीकच्या ठिकाणांना अधिक पसंती