राष्ट्रीय

कलाकारांनी समाज एकसंध बनवावा -मोहन भागवत

कलेचा उद्देश हा सुधारण्याचे काम करणारा आहे, समाज एकसंध बनवणे हा आहे. आपला समाज संपूर्ण जगाला स्वतःची उदाहरणे देऊन जीवनाची शिकवण सांगू शकेल असा बनवा, यासाठी संपूर्ण समाजाची गरज आहे.

Swapnil S

बंगळुरू : कलेचा उद्देश हा सुधारण्याचे काम करणारा आहे, समाज एकसंध बनवणे हा आहे. आपला समाज संपूर्ण जगाला स्वतःची उदाहरणे देऊन जीवनाची शिकवण सांगू शकेल असा बनवा, यासाठी संपूर्ण समाजाची गरज आहे. कलाविश्वाने संघटित होऊन या दिशेने काम करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले. मात्र सध्याच्या स्थितीत तसे घडत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या रा. स्व. संघाशी संलग्न असलेल्या 'संस्कार भारती'तर्फे येथील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमात आयोजित अखिल भारतीय कलासाधक संगमच्या समापन कार्यक्रमात ते बोलत होते.

देशातील कलाकारांनी संघटित होऊन समाजाच्या हिताची भूमिका समजून घेऊन त्यांनी त्यांच्या कलेचा सराव करावा, असे आवाहन कला सरावण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कलाकार आज त्यांच्या कलेची सामाजिक जीवनातील खरी भूमिका समजून न घेता कला जोपासत आहेत. समाजाच्या कल्याणासाठी ‘कार्यकर्ता’ म्हणून नि:स्वार्थपणे काम करण्यास त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, असे अनेक कलाकार आहेत जे प्रामाणिकपणे आपली कला जोपासत आहेत, पण ते वैयक्तिक असू नये. जर कला ही समाजाभिमुख असेल तर ती ‘अर्थहीन वादात’ अडकणार नाही किंवा लोकांमध्ये फूट पाडणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी