आसाममधील पुरातील मृतांची संख्या १०० वर 
राष्ट्रीय

आसाममधील पुरातील मृतांची संख्या १०० वर

आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने या वर्षातील पुरामुळे प्राण गमावणाऱ्यांची एकूण संख्या १०० वर पोहोचली आहे.

Swapnil S

गुवाहाटी: आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने या वर्षातील पुरामुळे प्राण गमावणाऱ्यांची एकूण संख्या १०० वर पोहोचली आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोलाघाट आणि कर्बी आंगलोंग जिल्ह्यांत प्रत्येकी एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. सध्या चराईदेव, दरंग, गोलाघाट, जोरहाट, कर्बी आंगलोंग, नगाव आणि शिवसागर या जिल्ह्यांतील १,३७,५०० हून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.

गोलाघाट जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून तेथे सुमारे ७० हजार जण प्रभावित झाले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

२०१५ पूर्वीच्या एकतर्फी मध्यस्थांच्या नेमणुका आपोआप रद्द ठरत नाहीत - मुंबई उच्च न्यायालय

पदवीदान समारंभात सरन्यायाधीशांच्या उपस्थितीवर नाराजी; लॉ विद्यापीठाच्या ४५० विद्यार्थ्यांचा CJI सूर्य कांत यांना विरोध

भिवंडीत १७ वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू

नगरसेवकांना मिळणार अद्ययावत टॅब; मुंबई महापालिका सभागृहाचा कारभार डिजिटल

विवाहपूर्व तपासणीसाठी पालकांचा खासगी गुप्तहेरांकडे मोर्चा; लोणावळ्यातील लोहगड हत्याकांडानंतर सखोल चौकशीवर भर