राष्ट्रीय

बस अपघातात 12 जणांचा मृत्यू

Swapnil S

आसाममधील डेरगाव येथे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण गंभीर जखमी झाले. 45 जणांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रक धडकल्याने हा अपघात झाला. हि बस तीनसुकियातील तिलिंगा मंदिरात पिकनिक पार्टीसाठी प्रवाश्यांना घेऊन जात होती. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकने या बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रवास करणारे लोकं 3 वाजता पिकनिक पार्टीसाठी निघाले होते. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले, तर किमान 12 जणांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी 12 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाच्या पुढील तपास करत आहे.

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?

LICची 'एक नंबर' स्कीम; छोटी रक्कम गुंतवून मिळेल लाखोंचा फायदा