राष्ट्रीय

विख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचे निधन

उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए हा गाजलेला शेर लिहिणारे डॉ. बशीर बद्र (वय ९१) यांचे गुरुवारी निधन झाले. उर्दू शायरीचे बादशहा अशी ओळख असणाऱ्या बद्रसाहेबांनी भोपाळमध्ये त्यांनी या नश्वर जगाचा निरोप घेतला.

Swapnil S

भोपाळ : उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए हा गाजलेला शेर लिहिणारे डॉ. बशीर बद्र (वय ९१) यांचे गुरुवारी निधन झाले. उर्दू शायरीचे बादशहा अशी ओळख असणाऱ्या बद्रसाहेबांनी भोपाळमध्ये त्यांनी या नश्वर जगाचा निरोप घेतला.

डॉ. बद्र यांच्या शायरीत प्रेमाचा प्रामाणिकपणा, जीवनातील कटुता, शहरी जीवनाची अस्वस्थता आणि भारतीय मातीचा सुगंध यांचा संगम आहे. उर्दू साहित्याचा आत्मा असलेले बशीर बद्र गेल्या जवळपास 14 वर्षांपासून स्मृतिभ्रंशाने ग्रस्त होते, ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती क्षीण झाली होती. एक काळ असा होता की त्यांच्याशिवाय मुशायरे अपूर्ण मानले जायचे. १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे जन्मलेल्या बशीर बद्र यांनी लहान वयातच शायरी लिहायला सुरुवात केली.

१९८७ च्या मेरठ दंगलींमध्ये त्यांचे घर जाळण्यात आले. ही घटना त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी होती. त्यांनी ही वेदना आपल्या शेरात मांडली. या घटनेनंतर, त्यांनी भोपाळला आपले घर बनवले आणि तिथे स्थायिक झाले.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये