बस्तरमधील गावांना एकेक कोटी रुपये कधी? बघेल यांचा अमित शहा यांना सवाल 
राष्ट्रीय

बस्तरमधील गावांना एकेक कोटी रुपये कधी? बघेल यांचा अमित शहा यांना सवाल

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Swapnil S

रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील मागील काँग्रेस सरकारच्या काळात नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत शहा खोटे दावे करत असल्याचे बघेल यांनी म्हटले आहे.

अमित शहा यांनी घोषणा केली होती की एखादे गाव नक्षलमुक्त घोषित झाल्यास त्या गावाला १ कोटी रुपये दिले जातील. आता नक्षलवाद संपला आहे, तर बस्तरमधील प्रत्येक गावाला हे १ कोटी रुपये कधी दिले जाणार, असा सवाल बघेल यांनी केला आहे.

बघेल यांनी आपल्या कार्यकाळातील बस्तरमधील उपक्रमांवरही प्रकाश टाकला, ज्यात वन हक्क कायदा लागू करणे, शाळा उघडणे, आरोग्य सुविधांची स्थापना आणि रेशन कार्डांचे वाटप यांचा समावेश होता. ते पुढे म्हणाले की, “भाजप सरकारने हे फायदे नाकारले होते, मात्र आम्ही स्थानिक समुदायांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले. नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे विकासकामे विस्तारली, ६०० गावे नक्षलमुक्त झाली आणि लोक मुख्य प्रवाहात परतले.”

सोमवारी लोकसभेत बोलताना अमित शहा यांनी जाहीर केले होते की, नक्षलवाद्यांची सर्वोच्च संस्था आणि मध्यवर्ती संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे देश आता नक्षलमुक्त झाला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, प्रदीर्घ काळ चाललेला नक्षलवादी हिंसाचार संपवण्यासाठी काँग्रेसने ‘काहीही’ केले नाही. तज्ज्ञांच्या मते, सत्तेत बसलेल्यांच्या पाठिंब्याशिवाय ‘रेड कॉरिडॉर’ (नक्षल प्रभावित क्षेत्र) तयार होऊच शकला नसता, असा आरोपही शहा यांनी केला.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी