Nishikant Dubey
राष्ट्रीय

भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे वक्तव्य बेजबाबदार; सुप्रीम कोर्टाचे ताशेरे; कोणतीही कारवाई नाही

निशिकांत दुबे यांचे वक्तव्य बेजबाबदार असून न्यायालयावर आरोप करून ते लोकांचे लक्ष आपल्याकडे वळवू इच्छितात, असा टोला न्यायालयाने मारला.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी न्यायपालिका व सरन्यायाधीश यांच्यावर केलेले वक्तव्य जेबाबदारपणाचे अजून स्वत:चे लक्ष खेचण्यासाठी केले, असे ताशेरे सुप्रीम कोर्टाने गुरुवारी ओढले. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई कोर्टाने केली नाही.

दुबे यांनी सरन्यायाधीश व न्यायपालिकेबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात वकील विशाल तिवारी यांनी जनहित याचिका दाखल केली होती. यात दुबे यांच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू करावी आणि द्वेषपूर्ण भाषणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत केली होती.

त्यावर सुनावणी करताना कोर्टाने सांगितले की, दुबे यांचे वक्तव्य न्यायालयीन कामकाजाबाबत त्यांचे अज्ञान दर्शवते. या बेजबाबदार वक्तव्यांमुळे न्यायपालिकेचे जनतेतील विश्वास डगमगणार नाही. दुबे यांच्या वक्तव्यामुळे न्यायालयाची प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळे न्यायव्यवस्थेत बाधा येऊ शकते. पण, त्यांचे वक्तव्य बेजबाबदार असून न्यायालयावर आरोप करून ते लोकांचे लक्ष आपल्याकडे वळवू इच्छितात, असा टोला न्यायालयाने मारला.

कोर्टाने सांगितले की, भारतात कोणतेही गृहयुद्ध होत नाही. कोणाच्या बेताल बोलण्यामुळे गप्प बसतील, इतकी न्यायालये कमजोर नाहीत. या वक्तव्यांमुळे जनतेचा न्यायपालिकेवरील विश्वास कमी होणार नाही. मात्र त्याबाबत प्रयत्न केले जात आहेत.

प्रत्येकवेळी शिक्षा देणे गरजेचे नाही
कोर्टाने सांगितले की, प्रत्येक अपमानास्पद वक्तव्यासाठी शिक्षा देणे गरजेचे नाही. न्यायाधीश समजूतदार असतात. त्यांची ताकद अहिंसक असते. जेव्हा मूल्याचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा त्यांचा समजूतदारपणा काम करतो. स्वतंत्र प्रसारमाध्यम, निष्पक्ष सुनावणी, न्यायिक निडरता, सामूदायिक विश्वास आदींवर न्यायालयाचा विश्वास असतो. न्यायालयांना आपल्या निकालांच्या संरक्षणासाठी अवमानात्मक शक्तीचा वापर करणे गरजेचे नाही, असे कोर्टाने सांगितले.

कोर्टाने सांगितले की, भारतात कोणतेही गृहयुद्ध होत नाही. कोणाच्या बेताल बोलण्यामुळे गप्प बसतील, इतकी न्यायालये कमजोर नाहीत. या वक्तव्यांमुळे जनतेचा न्यायपालिकेवरील विश्वास कमी होणार नाही. मात्र त्याबाबत प्रयत्न केले जात आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक