राष्ट्रीय

मतांची चोरी करून जिंकले! भाजपच्या आजी-माजी खासदारांमध्ये जुंपली; आरोपांमुळे भाजपची चांगलीच कोंडी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप करत वातावरण तापवले असतानाच आता भाजपच्या आजी-माजी खासदारांमध्येच मतचोरीवरून जुंपली आहे. खासदार राजीव प्रताप रुडी मत चोरी करुन विजयी झाल्याचा आरोप त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार संजीव बालियान यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप करत वातावरण तापवले असतानाच आता भाजपच्या आजी-माजी खासदारांमध्येच मतचोरीवरून जुंपली आहे. खासदार राजीव प्रताप रुडी मत चोरी करुन विजयी झाल्याचा आरोप त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार संजीव बालियान यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीत भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी संजीव बालियान यांचा पराभव केला. त्यात रुडी यांनी बालियान यांचा १०२ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे बालियान यांना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य मानल्या जाणाऱ्या अमित शहांचा पाठिंबा होता. त्यामुळे भाजपचे आजी-माजी खासदार त्यांना एकगठ्ठा मतदान करतील, असा अनेकांचा होरा होता. पण तरीही रुडी यांनी बालियान यांचा पराभव केला. गेल्या महिन्यात ही निवडणूक झाली. मात्र महिन्याभरानंतरही रुडी विरुद्ध बालियान संघर्ष थांबलेला नाही. त्यामुळे भाजपसाठी अडचण वाढली आहे.

कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीत मत चोरी झाल्याचा आरोप संजीव बालियान यांनी केला आहे. 'या निवडणुकीत आधी ६२९ मते पडल्याच सांगण्यात आले. त्यानंतर तासाभरात आणखी ४० मते पडली. कमीत कमी दोन माजी खासदार, काँग्रेसचे बृजेंद्र सिंह आणि बसपचे राजाराम यांनी अन्य कोणाला तरी मतदान केले. मतदार यादीत अनेक माजी खासदारांची नावे होती. त्यांच्या नावावर मतदान झाले की नाही, याची कल्पना नाही. त्यामुळे देशभरात एसआयआर व्हायला हवे ही माझी मागणी आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर आवाहन करतो,' असे बालियान म्हणाले. आजी-माजी खासदारांमध्ये सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे भाजपची गोची झाली आहे.

या निवडणुकीत राजीव प्रताप रुडी आणि संजीव बालियान या एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये थेट सामना झाला. संजीव बालियान भाजपचे अधिकृत उमेदवार होते. त्यांना महाशक्तीचा पाठिंबा होता. त्यामुळे राजीव प्रताप रुडी यांना विरोधकांनी साथ दिली.

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना