राष्ट्रीय

केंद्राचा एक राष्ट्र, एक निवडणुकीवर भर ; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

केंद्र सरकारने काल संसदेचं विशेष अधिवेश बोलवण्याची घोषणा केल्यानंतर लगेच आज हे पाऊल उचललं आहे.

नवशक्ती Web Desk

केंद्र सरकारने काल संसदेचं विशेष अधिवेश बोलवण्याची घोषणा केली. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान हे विशेष अधिवेश बोलावण्यात आलं आहे. याच्या दुसऱ्याचं दिवशी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज (१ सप्टेंबर) भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षेतखाली एका समिनीची स्थापना केली आहे. सरकारने "एक राष्ट्र, एक निवडणूक" ची शक्यता तपासण्यासाठी या समितीची स्थापना केली आहे.

"एक राष्ट्र, एक निवडणूक" वर मोदींचा भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षापासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यावर जोर दिला आहे. आता देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतची समिती स्थापन केल्याने सरकारचे याबाबतचं गांभिर्य अधोरेखीत होतं.

येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात देशातील पाच राज्यांच्या निवडणुका होणार असून पुढच्या वर्षी मे-जूनमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मोदी सरकार ने हे पाऊल उचलं असल्याचं बोललं जात आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश