दिल्ली : दिल्लीतील नरेला भागातील अलिपूर येथे रसायनाच्या फॅक्टरीला आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू जाला आहे. तर लाखो रुपयांचे सामान खाक झाले, अशी माहिती अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी दिली. या आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजून २५ वाजता केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.