राष्ट्रीय

‘जल-जंगल-जमीन’ व तरुणांच्या रोजगारासाठी काँग्रेस उभी -राहुल

काँग्रेस पक्ष हा आदिवासींच्या 'जल-जंगल-जमीन' आणि तरुणांच्या रोजगारासाठी उभा आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले.

Swapnil S

धनबाद : काँग्रेस पक्ष हा आदिवासींच्या 'जल-जंगल-जमीन' आणि तरुणांच्या रोजगारासाठी उभा आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले. झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात त्यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'त एका रोड शो दरम्यान ते बोलत होते.

शनिवारी जिल्ह्यातील तुंडी ब्लॉकमध्ये रात्रभर थांबल्यानंतर, झारखंडमधील त्यांच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी, रविवारी धनबाद शहरातील गोविंदपूर येथे यात्रा पुन्हा सुरू झाली. सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स खासगी उद्योगांना विकल्या जाण्यापासून वाचवणे आणि देशातील नोकरदार तरुणांना आणि आदिवासींना न्याय मिळवून देणे हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे, असे गांधी म्हणाले. ते म्हणाले की, आर्थिक असंतुलन, नोटाबंदी, जीएसटी आणि बेरोजगारी यांनी देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. यावेळी झारखंड काँग्रेसचे उपाध्यक्ष ब्रजेंद्र प्रसाद सिंह यांनी सांगितले की, गोविंदपूर येथून निघालेली यात्रा सरायधेला, आयआयटी-आयएसएम गेट, रणधीर वर्मा चौक, रेल्वे स्टेशनजवळील श्रमिक चौकातून पुढे गेली आणि बँक मोरे येथे पोहोचली तेथे गांधी यांनी जाहीर सभेत भाषण केले.

काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले की, बोकारो हे स्टीलचे शहर आहे. ही माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बांधलेली स्मारके आहेत. जेव्हा लोक म्हणतात की आम्ही ७० वर्षांत काय केले... भिलाई, राउरकेला, दुर्गापूर, भाक्रा नांगल, बोकारो, धनबाद, बरौनी, सिंद्री- ही सर्व आर्थिक विकासाची स्मारकेच आहेत, असेही रमेश यांनी सांगितले.

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

इराणच्या राजधानीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला; आणीबाणी जाहीर, भारतीय नागरिकांना दूतावासाचा इशारा

"तो भारदस्त आवाज पुन्हा…"; अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबीयांच्या भावनिक पोस्ट

होळीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग Ro-Ro सेवा उद्यापासून सुरू; जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर

वाहतूकदारांचा 'महाराष्ट्र बंद'चा इशारा; ५ मार्चला १ लाख वाहनांसह 'चलो आझाद मैदान'; ई-चलन व जाचक अटींविरोधात आरपारचा लढा