राष्ट्रीय

ज्ञानवापीप्रकरणी न्यायालयाने कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांना पदावरून हटवले

वृत्तसंस्था

ज्ञानवापीप्रकरणी वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. विशेष अधिवक्ता विशाल सिंह यांनी आयोगाच्या कामकाजात असहकार केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता, तसेच त्यांनी एक खासगी कॅमेरामन ठेवला होता आणि माध्यमांना ते बाइट्स देत होते. हे कायद्याने चुकीचे आहे, असे सिंह यांनी निदर्शनास आणल्यानंतर अजय मिश्रा यांना कोर्ट कमिशनरच्या पदावरुन हटवण्यात आले.

कोर्ट कमिशनरची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे कोर्टाने नमूद केले. आता विशाल सिंह नवे कोर्ट कमिशनर असतील. दुसरीकडे, आयोगाचा अहवाल न्यायालयात दाखल करण्यासाठी न्यायालयाने २ दिवसांची मुदत दिली आहे. आता १९ मे रोजी अहवाल दाखल करता येणार आहे.

भिंत पाडण्याबाबत आज सुनावणी

दरम्यान, आणखी दोन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. डीजीसी सिव्हिल आणि फिर्यादीच्या महिलांच्या आणखी दोन अर्जांवर उद्या म्हणजेच १८ मे रोजी सुनावणी होणार आहे. यामध्ये मशिदीच्या काही भिंती पाडून वझुखाना परिसर सील करून व्हिडिओग्राफी करण्याची मागणी झाली आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन