PM
राष्ट्रीय

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे धरणे

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा कवच वाढविले आहे.

Swapnil S

तिरुवअनंतपूरम/ कोल्लम : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा कवच वाढविले आहे. त्यात सहाव्या एसएएफआयच्या (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया) निषेधाचा सामना खान यांना करावा लागला. यामुळे संतप्त झालेल्या राज्यपालांनी एका कार्यक्रमासाठी कोट्टारक्करा येथे जात असताना ते मोटारीतून खाली उतरून रस्त्याच्या बाजूला बसले आणि पोलीस कारवाईची मागणी करून त्यांनी ठिय्या आंदोलनच केले.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना "अवैधतेला प्रोत्साहन" दिल्याबद्दल फटकारले आणि त्यानंतर खान यांना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या आंदोलक सदस्यांनी घेरले. या सर्व प्रकारामुळे भाजपने आपले वजन राज्यपालांमागे उभे केले असून या संबंधात राज्याचे सामान्य शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी म्हणाले की, देशातील कोणत्याही राज्याच्या राज्यपालाने असे वर्तन केले नाही, अशी टीका केली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने म्हटले आहे की, हा सर्व राज्य सरकार आणि राज्यपालांच्या राजकीय नाटकाचा भाग आहे. विजयन यांच्यावर ‘राज्यातील अराजकतेला चालना’ दिल्याचा आरोप करत खान म्हणाले, राज्याचे प्रमुख म्हणून अराजकता खपवून घेतली जाणार नाही. राज्यपालांनी असेही सांगितले की त्यांच्यावरील हल्ले हे डाव्या सरकारच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि काही कठोर कारवाई (त्याच्याकडून) चिथावणी देण्यासाठी आयोजित केले जात आहेत.

आजचे राशिभविष्य, १६ नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला