अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण (डावीकडूुन)
राष्ट्रीय

‘आप’च्या पराभवाला केजरीवालच जबाबदार! प्रशांत भूषण यांची टीका

दिल्ली विधानसभेतील पराभवाला अरविंद केजरीवाल हेच जबाबदार आहेत, अशी टीका ‘आप’चे सहसंस्थापक प्रशांत भूषण यांनी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील पराभवाला अरविंद केजरीवाल हेच जबाबदार आहेत, अशी टीका ‘आप’चे सहसंस्थापक प्रशांत भूषण यांनी केली. भूषण म्हणाले की, केजरीवाल यांनी ‘आप’ला एकाच व्यक्तीचे वर्चस्व असलेला आणि सर्वात भ्रष्ट पक्ष बनविला. केजरीवाल यांनी स्वतःसाठी शीशमहाल बांधला आणि ते आलिशान गाड्यातून प्रवास करत असत. प्रस्थापित पक्षांना पर्याय देण्यासाठी ‘आप’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र, पक्षाची कार्यपद्धती पारदर्शक, जबाबदार आणि लोकशाहीवर आधारित न ठेवता केजरीवाल यांनी पक्षाला स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवले. त्यांनी पक्षाला अपारदर्शक आणि भ्रष्ट स्वरुपात रूपांतरित केले. ज्यांनी लोकपालची मागणी केली होती, त्यांनीच लोकपाल काढून टाकला, असे भूषण म्हणाले.

केजरीवाल यांनी स्वतःसाठी ४५ कोटींचा शीशमहाल बांधला. ‘आप’ने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समित्यांचे ३३ तपशीलवार अहवाल त्यांनी रद्द केले. वेळ आली की, पक्ष सोयीस्कर धोरण स्वीकारेल. त्यांना वाटते की, केवळ प्रचार आणि भाषणबाजीने राजकारण करता येते. ही ‘आप’च्या शेवटाची सुरुवात आहे, असे त्यांनी सांगितले.

AI समिटमध्ये मोठी नाचक्की! चिनी रोबोटला स्वतः डेव्हलप केल्याचं सांगितलं; 'तात्काळ एक्स्पो स्थळ सोडा' - गलगोटिया विद्यापीठाला आदेश

मोठी बातमी! EC कडून राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा: महाराष्ट्रात सर्वाधिक ७ जागा, १६ मार्चला मतदान

Thane : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनचालकांना दिलासा; साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी अखेर खुला

Mumbai : स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट समितीसाठी आज अर्ज दाखल होणार

Mumbai : रस्ते खड्ड्यात घालणाऱ्या कंत्राटदारांना ३७ कोटींचा दंड; वसुली केवळ १६ कोटींची