अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण (डावीकडूुन)
राष्ट्रीय

‘आप’च्या पराभवाला केजरीवालच जबाबदार! प्रशांत भूषण यांची टीका

दिल्ली विधानसभेतील पराभवाला अरविंद केजरीवाल हेच जबाबदार आहेत, अशी टीका ‘आप’चे सहसंस्थापक प्रशांत भूषण यांनी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील पराभवाला अरविंद केजरीवाल हेच जबाबदार आहेत, अशी टीका ‘आप’चे सहसंस्थापक प्रशांत भूषण यांनी केली. भूषण म्हणाले की, केजरीवाल यांनी ‘आप’ला एकाच व्यक्तीचे वर्चस्व असलेला आणि सर्वात भ्रष्ट पक्ष बनविला. केजरीवाल यांनी स्वतःसाठी शीशमहाल बांधला आणि ते आलिशान गाड्यातून प्रवास करत असत. प्रस्थापित पक्षांना पर्याय देण्यासाठी ‘आप’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र, पक्षाची कार्यपद्धती पारदर्शक, जबाबदार आणि लोकशाहीवर आधारित न ठेवता केजरीवाल यांनी पक्षाला स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवले. त्यांनी पक्षाला अपारदर्शक आणि भ्रष्ट स्वरुपात रूपांतरित केले. ज्यांनी लोकपालची मागणी केली होती, त्यांनीच लोकपाल काढून टाकला, असे भूषण म्हणाले.

केजरीवाल यांनी स्वतःसाठी ४५ कोटींचा शीशमहाल बांधला. ‘आप’ने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समित्यांचे ३३ तपशीलवार अहवाल त्यांनी रद्द केले. वेळ आली की, पक्ष सोयीस्कर धोरण स्वीकारेल. त्यांना वाटते की, केवळ प्रचार आणि भाषणबाजीने राजकारण करता येते. ही ‘आप’च्या शेवटाची सुरुवात आहे, असे त्यांनी सांगितले.

शासकीय जमिनीवरील पात्र घरांना कायदेशीर मान्यता; २०११ पूर्वीच्या पात्र घरांसाठी सुवर्णसंधी; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार

Thane : सिग्नलवरील प्रतीक्षा अवधी १५ सेकंदांवर येणार; वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट