अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण (डावीकडूुन)
राष्ट्रीय

‘आप’च्या पराभवाला केजरीवालच जबाबदार! प्रशांत भूषण यांची टीका

दिल्ली विधानसभेतील पराभवाला अरविंद केजरीवाल हेच जबाबदार आहेत, अशी टीका ‘आप’चे सहसंस्थापक प्रशांत भूषण यांनी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील पराभवाला अरविंद केजरीवाल हेच जबाबदार आहेत, अशी टीका ‘आप’चे सहसंस्थापक प्रशांत भूषण यांनी केली. भूषण म्हणाले की, केजरीवाल यांनी ‘आप’ला एकाच व्यक्तीचे वर्चस्व असलेला आणि सर्वात भ्रष्ट पक्ष बनविला. केजरीवाल यांनी स्वतःसाठी शीशमहाल बांधला आणि ते आलिशान गाड्यातून प्रवास करत असत. प्रस्थापित पक्षांना पर्याय देण्यासाठी ‘आप’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र, पक्षाची कार्यपद्धती पारदर्शक, जबाबदार आणि लोकशाहीवर आधारित न ठेवता केजरीवाल यांनी पक्षाला स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवले. त्यांनी पक्षाला अपारदर्शक आणि भ्रष्ट स्वरुपात रूपांतरित केले. ज्यांनी लोकपालची मागणी केली होती, त्यांनीच लोकपाल काढून टाकला, असे भूषण म्हणाले.

केजरीवाल यांनी स्वतःसाठी ४५ कोटींचा शीशमहाल बांधला. ‘आप’ने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समित्यांचे ३३ तपशीलवार अहवाल त्यांनी रद्द केले. वेळ आली की, पक्ष सोयीस्कर धोरण स्वीकारेल. त्यांना वाटते की, केवळ प्रचार आणि भाषणबाजीने राजकारण करता येते. ही ‘आप’च्या शेवटाची सुरुवात आहे, असे त्यांनी सांगितले.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण