राष्ट्रीय

शेतकरी आंदोलन: उद्या केंद्रासोबत पुढील चर्चा; एका शेतकऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू

केंद्राच्या तीन मंत्र्यांच्या समितीने आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या नेत्यांबरोबर आतापर्यंत ८, १२ आणि १५ फेब्रुवारी रोजी चर्चेच्या तीन फेऱ्या पार पाडल्या

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अर्जुन मुंडा आणि पीयूष गोयल या केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले की, शेतकरी नेत्यांबरोबर केंद्राच्या शिष्टमंडळाची तिसरी बैठक सकारात्मक होती. यापुढील चर्चा उद्या म्हणजेच रविवारी होणार आहे.

केंद्राच्या तीन मंत्र्यांच्या समितीने आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या नेत्यांबरोबर आतापर्यंत ८, १२ आणि १५ फेब्रुवारी रोजी चर्चेच्या तीन फेऱ्या पार पाडल्या. त्यापैकी नुकत्याच झालेल्या तिसऱ्या फेरीत सकारात्मक चर्चा झाल्याचे ठाकूर यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच या संदर्भात अधिक चर्चा रविवारी होणार असल्याचीही माहिती दिली. याशिवाय अमित शहा, मुंडा आणि गोयल यांनीही नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयात भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. या बैठकीला गृह, कृषी आणि अन्य खात्यांचे सचिवही उपस्थित होते.

दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. शुक्रवारी आंदोलकांनी सकाळी ६ ते सायंकाळी ४ या वेळेत भारत बंदची हाक दिली होती. यापुढील काळात देशातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत चक्का जाम आंदोलन करणार असल्याचेही जाहीर केले. या आंदोलनामुळे दिल्ली शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक खोळांबली होती. पंजाब, हरयाणा आणि दिल्लीजवळच्या प्रदेशात पोलीस आणि आंदोलकांमधील झटापट सुरूच होती. पोलिसांनी केलेल्या ड्रोन, अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि अन्य उपायांना शेतकरी विविध प्रकारे उत्तर देत आहेत.

आंदोलनात शेतकऱ्याचा मृत्यू

आंदोलनातील एका वृद्ध शेतकऱ्याचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ग्यान सिंग (वय ६३) असे त्यांचे नाव असून सकाळी शंभू बॉर्डरजवळ आंदोलन करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते कोसळले. त्यांना पतियाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

RRB Recruitment 2026 : रेल्वेत ३,९९३ पदांसाठी मेगाभरती; अर्ज प्रक्रिया सुरू, पात्रता काय? जाणून घ्या

वाराणसी विमानतळावर धक्कादायक प्रकार! मुंबईकडे निघालेल्या प्रवाशाच्या पिस्तुलातून अचानक सुटली गोळी; दोन कर्मचारी जखमी

Mumbai : नेव्ही नगरमध्ये नौदल जवानासह पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू; घरात आढळले चौघांचे मृतदेह

शाहरुख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला FDA चा दणका; 'विमल इलायची' जाहिरातीप्रकरणी नोटीस

LPG eKYC Last Date : अजून ई-केवायसी केली नाही? आजच करा, नाहीतर सिलिंडर मिळण्यात येणार अडचण