@ANI
राष्ट्रीय

'अग्निपथ' योजनेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका; केंद्र सरकारला दिलासा

केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ भरती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

प्रतिनिधी

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी अग्निपथ भरती योजनेविरोधात असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी न्यायालयाने म्हंटले आहे की, या प्रकरणात दखल घेण्यासारखे कोणतेही कारण दिसत नाही. या योजनेचे उद्देश देशाच्या सैन्याला उत्तम पद्धतीने तयार करणे, हे आहे आणि ते देशाच्या हिताचे असे मत न्यायालायने याचिका फेटाळताना म्हंटले आहे. तसेच, जुन्या धोरणाच्या आधारे नियुक्तीची याचिका फेटाळत ही मागणी न्याय्य नसल्याचे सांगितले आहे.

अग्निपथ भरती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. तसेच उच्चं न्यायालयाने या याचिका लवकरात लवकर निकालात काढाव्यात, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत