Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

दिल्लीतील शाहदरा परिसरात उशिरा घरी परतल्यामुळे कुटुंबीयांनी रागावल्यानंतर १३ वर्षीय मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली. मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

Mayuri Gawade

नवी दिल्ली : उशिरा घरी परतल्यामुळे कुटुंबीयांनी रागावल्यानंतर १३ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना दिल्लीतील शाहदरा परिसरात घडली. शनिवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, कृष्णा नगरमधील राहत्या घरी मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या बहिणीने तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर खाली उतरवलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना पीसीआर कॉल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला तातडीने डॉ. हेडगेवार रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

उशिरा घरी परतल्याने कुटुंबीयांनी रागावलं

प्राथमिक चौकशीत मुलगी उशिरा घरी परतल्यामुळे कुटुंबीयांनी तिला रागावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर काही वेळाने तिच्या बहिणीला ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिने आरडाओरडा केल्यानंतर मुलीला खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आलं.

बहिणीचा फोन उचलला नाही

मृत मुलीच्या बहिणीसोबत काम करणाऱ्या एका शेजाऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, रात्री सुमारे ९.३० वाजता तिच्या बहिणीने मुलीला फोन केला होता. अनेकदा फोन करूनही तिने कॉल उचलला नाही. त्यामुळे तिची बहीण घाईघाईने घरी परतली.

"तिने अनेकदा दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही दरवाजा तोडला. त्यानंतर तिच्या बहिणीला ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिनेच दोरी कापून तिला खाली उतरवलं," असं शेजाऱ्याने सांगितलं.

दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू