बंगालमध्ये करू ‘यूपीस्टाईल एन्काऊंटर’; भाजप नेत्यांचे असेही आश्वासन 
राष्ट्रीय

बंगालमध्ये करू ‘यूपीस्टाईल एन्काऊंटर’; भाजप नेत्यांचे असेही आश्वासन

बंगालमध्ये भाजप सत्तेत आला तर उत्तर प्रदेशाप्रमाणे पोलीस चकमकी घडवून गुन्हेगारी संपवून टाकली जाईल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी केला आहे.

Swapnil S

कोलकाता : बंगालमध्ये भाजप सत्तेत आला तर उत्तर प्रदेशाप्रमाणे पोलीस चकमकी घडवून गुन्हेगारी संपवून टाकली जाईल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी केला आहे.

आपल्या जुन्या बालेकिल्ल्यात म्हणजेच खड़गपूर येथे निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना, भाजपच्या या माजी प्रदेशाध्यक्षांनी असा आरोप केला की, पश्चिम बंगालमधील पोलीस सध्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या इशाऱ्यावर काम करत असून गुन्हेगार आणि ‘माफिया’विरुद्ध कारवाई करण्यास अपयशी ठरत आहेत.

जे पोलीस आज माफियांसोबत बसून चहा पिताना आणि भ्रष्ट नेत्यांचे ‘चमचे’ म्हणून काम करताना दिसत आहेत, त्यांची वागणूक बदलून जाईल. हेच पोलीस उत्तर प्रदेशच्या धर्तीवर एन्काऊंटर करतील आणि गुन्हेगारांना तुरुंगात टाकतील, असे घोष म्हणाले.

उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या ‘एन्काऊंटर’ मॉडेलचा उल्लेख करणाऱ्या त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपवर उघडपणे बेकायदेशीर हिंसेचे समर्थन केल्याचा आरोप केला आहे. कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम म्हणाले, “एन्काऊंटर संस्कृती उत्तर प्रदेशात चालते, बंगालमध्ये नाही. निवडणूक आयोगाने त्यांच्या भाषणाची दखल घेतली पाहिजे.”

टीकेमुळे डगमगून न जाता, आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या घोष यांनी सत्ताधारी पक्षावर आपला हल्ला अधिक तीव्र केला. खड़गपूरमध्ये आपण दीर्घकाळापासून “गुंड आणि माफियांशी” लढा दिला असून यापुढेही तो सुरू ठेवू, असा दावा त्यांनी केला.

२०१६ ते २०१९ या काळात खड़गपूर सदर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घोष यांना भाजपने पुन्हा याच मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये जेव्हा भाजपने आपल्या पारंपारिक क्षेत्राबाहेर विस्तार करण्यास सुरुवात केली, तेव्हा हा मतदारसंघ पक्षाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला होता.

दिलीप घोष म्हणाले...

धमकावण्याचे आरोप: "आम्ही लोकांना शस्त्रांच्या धाकाने धमकावल्याचे गुन्हे आमच्यावर दाखल करण्यात आले. तुम्ही का घाबरता? जर तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या," असे आव्हान त्यांनी दिले.

निवडणूक आयोगाकडे तक्रार: घोष यांनी राज्य प्रशासनावर सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकल्याचा आरोपही केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कटआऊट्स काढण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे सांगितले.

रायगडात महायुतीचे नवे राजकीय समीकरण; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शिंदेसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र

शास्ती माफ योजनेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिकेच्या तिजोरीत एका दिवसात १३.५० कोटींची भर

Iran vs US-Israel War : होर्मुझवर इराणची घट्ट पकड, युद्ध आणखी भडकणार? मध्यपूर्वेतील युद्धात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता

अनुदानित चिनी, इंडोनेशियन पेपरबोर्ड आयातीविरुद्ध चौकशी; देशांतर्गत उद्योगांवर परिणाम होत असल्याने भारताने उचलले पाऊल

मुंबईत ४० जणांना हवंय इच्छामरण; देशातील हरीश राणाच्या पहिल्या प्रकरणानंतर BMC वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर