राष्ट्रीय

नितीश कुमारांसाठी दरवाजा नेहमीच खुला आहे -लालूप्रसाद

राजदशी असमारी अल्पकालीन युती जदयूने संपुष्टात आणली आणि नितीश कुमार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतले.

Swapnil S

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी पक्षाचे दार नेहमीच खुले आहे, असे राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी शुक्रवारी सांगितले.

राजदशी असमारी अल्पकालीन युती जदयूने संपुष्टात आणली आणि नितीश कुमार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतले. याबद्दल प्रसाद यांनी मौन बाळगले होते. मात्र नितीश कुमार आणि लालूप्रसाद यांनी गुरुवारी विधानसभेच हस्तांदोलन केले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी लालूप्रसाद यादव यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना परत येऊ द्या, मग बघू.

१९७० च्या दशकात विद्यार्थी नेते म्हणून नितीश कुमार यांना त्यांच्या त्या दिवसांपासून ओळखणारे लालूप्रसाद, या माजी सहयोगीसाठी दरवाजे अजूनही खुले आहेत की नाही यावर ते नेहमीच खुले असतात, असे सांगितले.

तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी लालूप्रसाद यांच्या या वक्तव्यावर सांगितले की, लालूजींच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे? नितीश कुमार यांनी ते ठरवायचे आहे की, त्यांना भाजपसोबत राहावयाचे आहे की, राजदसोबत जायचे आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती