राष्ट्रीय

नितीश कुमारांसाठी दरवाजा नेहमीच खुला आहे -लालूप्रसाद

राजदशी असमारी अल्पकालीन युती जदयूने संपुष्टात आणली आणि नितीश कुमार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतले.

Swapnil S

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी पक्षाचे दार नेहमीच खुले आहे, असे राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी शुक्रवारी सांगितले.

राजदशी असमारी अल्पकालीन युती जदयूने संपुष्टात आणली आणि नितीश कुमार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतले. याबद्दल प्रसाद यांनी मौन बाळगले होते. मात्र नितीश कुमार आणि लालूप्रसाद यांनी गुरुवारी विधानसभेच हस्तांदोलन केले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी लालूप्रसाद यादव यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना परत येऊ द्या, मग बघू.

१९७० च्या दशकात विद्यार्थी नेते म्हणून नितीश कुमार यांना त्यांच्या त्या दिवसांपासून ओळखणारे लालूप्रसाद, या माजी सहयोगीसाठी दरवाजे अजूनही खुले आहेत की नाही यावर ते नेहमीच खुले असतात, असे सांगितले.

तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी लालूप्रसाद यांच्या या वक्तव्यावर सांगितले की, लालूजींच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे? नितीश कुमार यांनी ते ठरवायचे आहे की, त्यांना भाजपसोबत राहावयाचे आहे की, राजदसोबत जायचे आहे.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...