राष्ट्रीय

नितीश कुमारांसाठी दरवाजा नेहमीच खुला आहे -लालूप्रसाद

राजदशी असमारी अल्पकालीन युती जदयूने संपुष्टात आणली आणि नितीश कुमार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतले.

Swapnil S

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी पक्षाचे दार नेहमीच खुले आहे, असे राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी शुक्रवारी सांगितले.

राजदशी असमारी अल्पकालीन युती जदयूने संपुष्टात आणली आणि नितीश कुमार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतले. याबद्दल प्रसाद यांनी मौन बाळगले होते. मात्र नितीश कुमार आणि लालूप्रसाद यांनी गुरुवारी विधानसभेच हस्तांदोलन केले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी लालूप्रसाद यादव यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना परत येऊ द्या, मग बघू.

१९७० च्या दशकात विद्यार्थी नेते म्हणून नितीश कुमार यांना त्यांच्या त्या दिवसांपासून ओळखणारे लालूप्रसाद, या माजी सहयोगीसाठी दरवाजे अजूनही खुले आहेत की नाही यावर ते नेहमीच खुले असतात, असे सांगितले.

तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी लालूप्रसाद यांच्या या वक्तव्यावर सांगितले की, लालूजींच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे? नितीश कुमार यांनी ते ठरवायचे आहे की, त्यांना भाजपसोबत राहावयाचे आहे की, राजदसोबत जायचे आहे.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली