राष्ट्रीय

‘इंडिगो’त प्रवाशावर उभ्याने प्रवासाची वेळ, चूक लक्षात येताच विमान माघारी परतले

खासगी बस, रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा प्रवासी सीट न मिळाल्याने उभ्याने प्रवास करतात. आता श्रीमंतांच्या हवाई सेवेतही असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : खासगी बस, रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा प्रवासी सीट न मिळाल्याने उभ्याने प्रवास करतात. आता श्रीमंतांच्या हवाई सेवेतही असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात एक प्रवासी जादा झाल्याने त्याला बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे या प्रवाशाने उभ्यानेच प्रवास सुरू केला.

इंडिगो एअरलाईन्सचे विमान मुंबई-वाराणसीदरम्यान उड्डाण करणार होते. त्याचवेळी विमान कर्मचाऱ्याला एक प्रवासी विमानात उभ्याने प्रवास करीत असल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्याने ही माहिती वैमानिकाला दिली. त्यामुळे ‘टेक ऑफ’ सुरू केलेले हे विमान पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळावर परतले. येथे सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. विमान कंपनीने सर्व प्रवाशांच्या केबिनमधील सामानाची तपासणी केली. विमान पूर्ण भरलेले असतानाही प्रवाशाला तिकीट दिले गेले होते.

या प्रकारामुळे आता विमान प्रवासालाही रेल्वे व बस सेवेतील गोंधळाची बाधा झाली की काय, असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. रेल्वेमध्ये व बसमध्ये प्रवाशांना बसायला जागा मिळाली नाही, तर ते बऱ्याचदा त्रास सहन करून आपले इच्छित स्थळ गाठण्याचा प्रयत्न करतात. तसाच प्रकार आता विमान प्रवासातही सुरू होणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कंपनीने व्यक्त केली दिलगिरी

इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान उड्डाणापूर्वी कंपनीला ही बाब लक्षात आली. त्यामुळे विमान कंपनीने त्या प्रवाशाला उतरवले. कंपनी आपल्या परिचलनातील प्रक्रिया अधिकाधिक निर्दोष करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबाबत कंपनीने दिलगिरी व्यक्त केली.

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

आता जिल्हा रुग्णालयापर्यंत 'मानकांनुसार आरोग्यसेवा'; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा निर्णय