राष्ट्रीय

शेतकऱ्यांना पोलिसांनी नोएडा येथे रोखले; सीमेवर चक्काजाम

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनावर दबाव बनवण्यासाठी ७ फेब्रुवारीला शेतकरी महापंचायत बनवली होती.

Swapnil S

नवी दिल्ली : पायाभूत सुविधांसह अन्य कामासाठी घेतलेल्या भूखंडाच्या वाढीव नुकसानभरपाईसाठी शेतकरी संघटना डिसेंबर २०२३ पासून आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी नोएडा व ग्रेटर नोएडा विकास प्राधिकरणाकडून भूखंड व वाढीव नुकसानभरपाईची मागणी केली. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी दिल्लीकडे वाटचाल सुरू केली. संसदेला घेराव घालून मागण्या मांडण्याचा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेश-दिल्ली महामार्गावर चक्काजाम झाला. या आंदोलनामुळे नोएडा एक्स्प्रेस-वे बंद केला आहे.

नोएडा, ग्रेटर नोएडा प्राधिकरण, एनटीपीसी व अंसल बिल्डरच्या विरोधात नोएडा येथील शेतकरी ६० दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांना तीन शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनावर दबाव बनवण्यासाठी ७ फेब्रुवारीला शेतकरी महापंचायत बनवली होती. ८ फेब्रुवारीला संसदेपर्यंत मार्च काढण्याची घोषणा केली. आंदोलक शेतकऱ्यांना ठिकठिकाणी पोलीस रोखत आहेत. पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट उडत आहे. ट्रॅक्टर ट्रॉली व चालत दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने १४४ कलम लागू केले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस