@manipur_police/ X
राष्ट्रीय

Manipur: मणिपूरमधील हिंसाचारात पाच जणांचा बळी

मणिपूरमध्ये शनिवारी जिरीबाम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

इंफाळ : मणिपूरमध्ये शनिवारी जिरीबाम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

सुरक्षा दलांनी चुराचांदपुर जिल्ह्यात दहशतवाद्यांचे तीन बंकर्स उद‌्ध्वस्त केले आहेत. विष्णूपूर जिल्ह्याच्या लगतच्या भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्यात एक व्यक्तीचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले.

पोलिसांनी सांगितले की, एका झोपलेल्या व्यक्तीला गोळी मारली तर अन्य चौघेजण आपापसातील गोळीबारात मरण पावले.

दरम्यान, राज्यातील तणावाची परिस्थिती पाहता सरकारने शाळा व महाविद्यालये बंद केली आहे. कमिटी ऑन मणिपूर इंटिग्रिटी या संस्थेने कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याप्रकरणी जनता संचारबंदीचे आवाहन केले आहे. राजधानी इंफाळमधील दुकाने शनिवारी सकाळपासून बंद आहेत. रस्ते व बाजारात चिटपाखरूही नाही.

मणिपूरमध्ये १ ते ७ सप्टेंबर दरम्यान हिंसेच्या चार घटना घडल्या आहेत. आतापर्यंत तीन घटनांमध्ये ३ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी झाले.

वर्गात मोबाईलला बंदी! जगातील निम्म्याहून अधिक देशांनी घेतला मोठा निर्णय; UNESCO अहवालातून उघड

मुंबईत वॉटर मेट्रो येणार? कल्याण-गेटवे ३४० किमी मार्ग; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता

Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर....

पाळीव मांजर ठेवण्यास कुटुंबीयांचा विरोध; २३ वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! हुंड्यासाठी पतीकडून पत्नीची हत्या; अवघ्या ४ महिन्यांत संसार उद्ध्वस्त