राष्ट्रीय

२८ लाख रुपयांचा गांजा जप्त, दोघांना अटक

ओदिशातून मंगळुरू आणि केरळला नेला जाणारा १२० किलो गांजा केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Swapnil S

मंगळुरू : ओदिशातून मंगळुरू आणि केरळला नेला जाणारा १२० किलो गांजा केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे जण वायनाड व कन्नूर येथील असून त्यांची नावे एम. एस. अनूप (२८) आणि के. व्ही. लतीफ (३६) अशी आहेत. माहितीच्या आधारे केंद्रीय गुन्हे शाखेचे निरीक्षक श्याम सुंदर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी कर्नाटक-केरळ सीमेवर तळपाडी येथील पिलिकूर येथे छापा टाकला आणि या दोघांना अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. जप्त केलेल्या गांजाची किंमत २८ लाख रुपये आहे. तसेच त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन, ४०२० रुपये रोख आणि एक जीपही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ३,५१,४५२० रुपये आहे.

...तर मी निश्चितच राजीनामा देईन! अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भूमिका; कुणालाही पाठीशी घालणार नाही!

अजित पवारांच्या विमान अपघाताचे सत्य उलगडणार; केंद्रीय मंत्र्यांनी लावली AAIB मार्फत चौकशी; रोहित पवारांची मागणी मान्य

षडयंत्र रचल्याने अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा दावा

'राष्ट्रवादी'च्या राष्ट्रीय अध्यक्षांची १५ दिवसांत निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच होणार शिक्कामोर्तब?

लोकसभेत हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी; सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब