राष्ट्रीय

२८ लाख रुपयांचा गांजा जप्त, दोघांना अटक

ओदिशातून मंगळुरू आणि केरळला नेला जाणारा १२० किलो गांजा केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Swapnil S

मंगळुरू : ओदिशातून मंगळुरू आणि केरळला नेला जाणारा १२० किलो गांजा केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे जण वायनाड व कन्नूर येथील असून त्यांची नावे एम. एस. अनूप (२८) आणि के. व्ही. लतीफ (३६) अशी आहेत. माहितीच्या आधारे केंद्रीय गुन्हे शाखेचे निरीक्षक श्याम सुंदर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी कर्नाटक-केरळ सीमेवर तळपाडी येथील पिलिकूर येथे छापा टाकला आणि या दोघांना अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. जप्त केलेल्या गांजाची किंमत २८ लाख रुपये आहे. तसेच त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन, ४०२० रुपये रोख आणि एक जीपही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ३,५१,४५२० रुपये आहे.

मुंबईत १ लाख झाडे लावण्याचा संकल्पच महापौर रितू तावडे यांच्याकडून हरित मुंबई अभियानाला गती

Navi Mumbai : पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना; अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंदचे आदेश

'नहीं बोलूंगा मराठी!'; मुंबई सेंट्रल स्थानकावरील चौकशी कक्षात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी, VIDEO व्हायरल

Ambernath : घरात CCTV लावून ठेवायचा पाळत; लग्नानंतर ४८ दिवसांत विवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीसह तिघांना अटक

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला गती मिळणार; प्रकल्पांसाठी 'एमआरव्हीसी'ला हवेत ६४,६४४ कोटी