राष्ट्रीय

२८ लाख रुपयांचा गांजा जप्त, दोघांना अटक

ओदिशातून मंगळुरू आणि केरळला नेला जाणारा १२० किलो गांजा केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Swapnil S

मंगळुरू : ओदिशातून मंगळुरू आणि केरळला नेला जाणारा १२० किलो गांजा केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे जण वायनाड व कन्नूर येथील असून त्यांची नावे एम. एस. अनूप (२८) आणि के. व्ही. लतीफ (३६) अशी आहेत. माहितीच्या आधारे केंद्रीय गुन्हे शाखेचे निरीक्षक श्याम सुंदर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी कर्नाटक-केरळ सीमेवर तळपाडी येथील पिलिकूर येथे छापा टाकला आणि या दोघांना अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. जप्त केलेल्या गांजाची किंमत २८ लाख रुपये आहे. तसेच त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन, ४०२० रुपये रोख आणि एक जीपही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ३,५१,४५२० रुपये आहे.

Mumbai : रुग्णवाहिका आरटीओच्या रडारवर; आठ महिन्यांत ८२ रुग्णवाहिकांवर कारवाई

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक संशयित अटकेत

कराड : बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचा मृत्यू; नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, चौकशीची मागणी

मुंबईतील धोकादायक चार पादचारी पूल बंद; मस्जिद, माटुंगा स्थानकांवरील वाहतूक रोखणार

आठव्या आशियाई विजेतेपदाचे लक्ष्य! महिलांच्या टी-२० आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आज भारत आणि श्रीलंका भिडणार