राष्ट्रीय

२८ लाख रुपयांचा गांजा जप्त, दोघांना अटक

ओदिशातून मंगळुरू आणि केरळला नेला जाणारा १२० किलो गांजा केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Swapnil S

मंगळुरू : ओदिशातून मंगळुरू आणि केरळला नेला जाणारा १२० किलो गांजा केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे जण वायनाड व कन्नूर येथील असून त्यांची नावे एम. एस. अनूप (२८) आणि के. व्ही. लतीफ (३६) अशी आहेत. माहितीच्या आधारे केंद्रीय गुन्हे शाखेचे निरीक्षक श्याम सुंदर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी कर्नाटक-केरळ सीमेवर तळपाडी येथील पिलिकूर येथे छापा टाकला आणि या दोघांना अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. जप्त केलेल्या गांजाची किंमत २८ लाख रुपये आहे. तसेच त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन, ४०२० रुपये रोख आणि एक जीपही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ३,५१,४५२० रुपये आहे.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला जल्लोषात प्रारंभ

मुंबईत हाय अलर्ट! ३४ मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी; 'लष्कर ए जिहादी'चा पोलिसांना संदेश

मला विचारून 'जीआर' काढल्याचा गैरसमज पसरवू नका! मंत्री भुजबळांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा

अंजना कृष्णा धमकी प्रकरण : अजितदादांची सारवासारव; अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता!