राष्ट्रीय

दिल्लीत पुन्हा पावसाचा जोर - झारखंड, ओदिशाला ऑरेंज अलर्ट जारी

दिल्लीसह उत्तर आणि पूर्व भारतातही पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतात काहीशा विश्रांतीनंतर शनिवारी सायंकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून, झारखंड आणि ओदिशाला रविवारी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

गेला आठवडाभर अतिवृष्टीने थैमान घातलेल्या उत्तर भारताला गेले दोन-तीन दिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा मिळाला होता, पण शनिवारी संध्याकाळपासून दिल्लीत पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पुन्हा पाणी साचले आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. रविवारी दुपारी दोन वाजता यमुनेची पाणी पातळी २०५.७८ मीटर्सवर पोहोचली होती. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), पोलीस आणि अन्य बचाव पथके नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत करत होती. गाळ अडकल्याने बंद झालेले यमुना बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यासाठी नौदलाचे प्रयत्न सुरू आहेत.

दिल्लीसह उत्तर आणि पूर्व भारतातही पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा, कांगडा, सिरमौर, कुलू आणि सिमला या जिल्ह्यांत सोमवारपर्यंत मध्यम ते गंभीर पुराचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी हवामान खात्याने झारखंड आणि ओदिशाला या राज्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Union Budget 2026 : मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट; नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून; अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

भारताच्या 'ऑरेंज इकॉनॉमी'ला मिळाला IIT चा दर्जा! बजेट २०२६ मध्ये क्रिएटर इकॉनॉमीसाठी मोठी घोषणा

Thane : महापालिकेत नवीन समीकरणांची नांदी; स्थायी समिती व स्वीकृत पदांसाठी शिंदेसेना-भाजपमध्ये लॉबिंग

रायबाकिनाला जेतेपद; आर्यना सबालेंकाचा झंझावात रोखला; ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणारी कझाकस्तानची पहिली टेनिसपटू

Nirmala Sitharaman : यंदाची 'बजेट डे साडी' आहे खास! काय आहेत वैशिष्ट्य? याआधीही नेसल्या होत्या युनिक साड्या; पाहा Photo's