राष्ट्रीय

व्हीएतनामला भेट देणाऱ्या भारतीयांत वाढ

व्हिएतजेट सध्या भारतासाठी १७ थेट उड्डाणे चालवत आहे आणि अलीकडेच दा नांगला मुंबई आणि नवी दिल्लीला जोडल्याने भारतीय पर्यटकांची मोठी सोय

अभय जोशी

कोरोना महामारीनंतर, व्हिएतनामला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या सतत वाढत आहे. थायलंड किंवा सिंगापूरसारख्या आग्नेय आशियातील लोकप्रिय पर्यटन स्थळे निवडण्याऐवजी, भारतीय पर्यटक आता हळूहळू त्यांचे लक्ष व्हिएतनामकडे वळवू लागले आहेत. हनोई, हो ची मिन्ह सिटी, फु क्वोक, द नांग, होए यान आदी शहरांना भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या वाढत आहे. व्हिएतनाम नॅशनल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ टुरिझमनुसार, या वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत व्हिएतनामला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत सरासरी मासिक ५१ टक्के वाढ झाली तर ऑक्टोबरमध्ये एकूण २०,६८१ भारतीयांनी भेट दिली आणि २०२२ च्या पहिल्या १० महिन्यांत ही संख्या ८२,०६६ इतकी झाली. व्हिएतजेट सध्या भारतासाठी १७ थेट उड्डाणे चालवत आहे आणि अलीकडेच दा नांगला मुंबई आणि नवी दिल्लीला जोडल्याने भारतीय पर्यटकांची मोठी सोय झाली आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली