भारतातील बिअर उद्योगाची दुपटीने वाढ; नफ्याचे प्रमाण तुलनेत मात्र कमीच : युनायटेड ब्रुअरीज कंपनीचा दावा 'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

भारतातील बिअर उद्योगाची दुपटीने वाढ; नफ्याचे प्रमाण तुलनेत मात्र कमीच : युनायटेड ब्रुअरीज कंपनीचा दावा

भारतातील बिअर उद्योगामध्ये सध्या सकारात्मक वातावरण पाहायला मिळत असून, गेल्या काही महिन्यांत विक्रीमध्ये जवळपास दुहेरी अंकी (जवळपास १० टक्के) वाढ झाली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतातील बिअर उद्योगामध्ये सध्या सकारात्मक वातावरण पाहायला मिळत असून, गेल्या काही महिन्यांत विक्रीमध्ये जवळपास दुहेरी अंकी (जवळपास १० टक्के) वाढ झाली आहे. राज्यांच्या स्तरावर झालेले सकारात्मक सुधारणा कायदे आणि अनुकूल हवामान यामुळे या विक्रीला गती मिळाली आहे, अशी माहिती 'युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गुप्ता यांनी दिली.

गुप्ता यांनी स्पष्ट केले की, विक्रीत जोरदार वाढ होत असली तरी कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपनीच्या नफ्याचे प्रमाण अजूनही दबावाखाली आहे. बिअर क्षेत्रातील ट्रेंड सकारात्मक आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमधील चांगले सुधारणा कायदे आणि हवामान यामुळे ही वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.

सध्या टॉप-लाईन (एकूण महसूल) वाढ खूप चांगली आहे. त्याच वेळी युद्धाच्या प्रभावामुळे झालेल्या नफ्यातील घट भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सुरू असलेल्या जागतिक संघर्षांमुळे काचेच्या बाटल्या आणि कॅन्सच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ॲल्युमिनियमच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे कॅन्सचा खर्च वाढला आहे. परकीय चलनाचे प्रतिकूल दर आणि कमकुवत रुपया यामुळे व्यवसाय करण्याचा खर्च वाढला आहे.

तरुणांची बिअरला पसंती

अहवालात बदलत्या जीवनशैलीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तरुण पिढी कडक मद्याऐवजी बिअरसारख्या सौम्य अल्कोहोल पेयांना पसंती देत आहे. कंपनीच्या अंतर्गत निरीक्षणानुसार, जे लोक पहिल्यांदा मद्यप्राशन करतात, त्यापैकी ७० ते ७५ टक्के लोक बिअरने सुरुवात करतात. यामुळे देशात बिअरचा वापर आणि पोहोच सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यातील एसटी बसेस इलेक्ट्रिक होणार; परिवहन मंत्र्यांची माहिती

मृत जनावरांचा मुद्दा स्थायी समितीत गाजला; पाच वर्षांत किती जनावरे दगावली - सदस्यांचा सवाल

चर्च मिशनरीच्या जमिनींची तीन महिन्यांत चौकशी; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

धरणक्षेत्रात पावसाची 'टी-२०'! २४ तासांत पाणीसाठ्यात १२.४४ टक्क्यांनी वाढ; राखीव उपशाला ब्रेक, तुळशी तलावही ओव्हरफ्लो!

पाताळगंगेत HPCL चे ३,००० गॅस सिलेंडर वाहून गेले; फुकटात टाक्या नेण्यासाठी नागरिकांची गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचं आवाहन