राष्ट्रीय

भारताची मालदीवला जीवनावश्यक वस्तूंची मदत

भारताने तांदूळ, साखर व कांदा निर्यातीला बंदी घातली आहे. कारण देशात निवडणूक सुरू आहेत. त्यामुळे देशात जीवनावश्यक वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत आणि मालदीवमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच भारताने मालदीवला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. साखर, गहू, तांदूळ व कांदा यांच्यासहित जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यास परवानगी देण्यात आली आहे.

सध्या चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारत व मालदीवचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. भारताने तांदूळ, साखर व कांदा निर्यातीला बंदी घातली आहे. कारण देशात निवडणूक सुरू आहेत. त्यामुळे देशात जीवनावश्यक वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे.

भारताने मालदीवला १२४,२१८ मेट्रिक टन तांदूळ, १०९१६२ टन गव्हाचे पीठ, ६४,४९४ टन साखर, २१५१३ टन बटाटा, ३५७४९ टन कांदा व ४२७.५ दशलक्ष अंड्यांच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. तसेच भारताने दगड व नदीतील वाळू निर्यातीला परवानगी दिली आहे. मालदीवला १ दशलक्ष टन निर्यात केली जाणार आहे.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार