राष्ट्रीय

भारताची मालदीवला जीवनावश्यक वस्तूंची मदत

भारताने तांदूळ, साखर व कांदा निर्यातीला बंदी घातली आहे. कारण देशात निवडणूक सुरू आहेत. त्यामुळे देशात जीवनावश्यक वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत आणि मालदीवमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच भारताने मालदीवला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. साखर, गहू, तांदूळ व कांदा यांच्यासहित जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यास परवानगी देण्यात आली आहे.

सध्या चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारत व मालदीवचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. भारताने तांदूळ, साखर व कांदा निर्यातीला बंदी घातली आहे. कारण देशात निवडणूक सुरू आहेत. त्यामुळे देशात जीवनावश्यक वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे.

भारताने मालदीवला १२४,२१८ मेट्रिक टन तांदूळ, १०९१६२ टन गव्हाचे पीठ, ६४,४९४ टन साखर, २१५१३ टन बटाटा, ३५७४९ टन कांदा व ४२७.५ दशलक्ष अंड्यांच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. तसेच भारताने दगड व नदीतील वाळू निर्यातीला परवानगी दिली आहे. मालदीवला १ दशलक्ष टन निर्यात केली जाणार आहे.

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब