राष्ट्रीय

भारत विमान उत्पादनाचे हब बनणार - मोदी

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वडोदरा येथे C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची कोनशिला बसविण्यात आली

वृत्तसंस्था

भारत मोठे उत्पादन क्षेत्र बनणार असून, येथे तयार होणारी वाहतूक विमाने केवळ आपल्या सैन्याला बळ देणार नाहीत तर प्रवासी विमान निर्मिती लवकरच सुरू होऊन एक नवीन हब म्हणून विकसित होईल. लवकरच भारत मेक इन इंडिया टॅगसह बनवले जाणारे प्रवासी विमान देखील बनवणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वडोदरा येथे C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची कोनशिला बसविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि शहरी कार्यकारी उपाध्यक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.

ते पुढे म्हणाले, आज भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्रांपैकी एक आहे. आम्ही लवकरच हवाई वाहतुकीच्या बाबतीत पहिल्या तीन देशांच्या यादीत प्रवेश करणार आहोत. येत्या १० ते १५ वर्षांत भारताला दोन हजारांहून अधिक प्रवासी आणि मालवाहू विमानांची गरज भासणार आहे. आपण किती वेगाने विकसित होत आहोत हे यातून दिसून येते.

प्रगतीचा एक मुख्य पैलू म्हणजे मानसिकता बदलणे. केवळ सरकारलाच सर्व काही कळते आणि त्यांनीच सर्व काही करावे, या मानसिकतेने सरकारे प्रदीर्घ काळापासून कार्यरत आहेत. या मानसिकतेने देशातील कलागुणांना दडपून टाकले आणि खाजगी क्षेत्र वाढू दिले नाही.

या प्रकल्पामुळे ६०० उच्च कुशल कामगारांना थेट नोकरी मिळेल, तर तीन हजारांहून अधिकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. याशिवाय, अतिरिक्त तीन हजार मध्य कुशल कामगारांना हवाई क्षेत्रात आणि संरक्षण क्षेत्रात ४२.५ लाख मानवी तास काम करण्याची संधी मिळेल, तर सुमारे २४० इंजिनिअर्स स्पेशन येथील एअरबस फॅसिलिटी प्रकल्पामध्ये प्रशिक्षित केले जातील.

देशात प्रथमच खासगी कंपनी विमान बनवणार आहे. टाटा एअरबस या विमानांची निर्मिती करणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षण सचिव अरमानी गिरीधर यांच्या म्हणण्यानुसार, ४० विमानांव्यतिरिक्त, टाटा-एअरबस देखील हवाई दलाच्या गरजेनुसार आणि वाहतुकीवर आधारित अतिरिक्त विमानांची निर्मिती करेल.

गेल्या वर्षी, सप्टेंबर २०२१मध्ये, भारतीय हवाई दलाने युरोपच्या एअरबसशी करार केला होता. या करारांतर्गत टाटा कंपनीच्या सहकार्याने भारतातच ४० विमाने तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानाच्या निर्मितीमध्ये भारताचे ९६ स्टेक असतील.

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात बनवलेल्या विमानांचा पुरवठा २०२६ ते २०३१ दरम्यान होईल. त्याच वेळी, पूर्वीची १६ विमाने २०२३ ते २०२५ दरम्यान येतील. भारतीय हवाई दलाचे उपाध्यक्ष एअर मार्शल संदीप सिंग यांनी सांगितले की, हा करार पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दल सी-२९५ वाहतूक विमानांचे सर्वात मोठे ऑपरेटर बनेल. संरक्षण सचिव अरमानी गिरीधर म्हणाले की, या विमानांच्या निर्मितीमध्ये आमचा प्रयत्न असेल की काहीही झाले तरी ते भारतातच बनवण्याचा प्रयत्न केला जावा.

सुप्रीम कोर्टात WhatsAppचा यू-टर्न; युजर्सच्या संमतीशिवाय डेटा शेअरिंग नाही, स्पर्धा आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी मान्य

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेनच्या स्वप्नाला वेग; जपानमध्ये भारतीय लोको पायलटांचे विशेष प्रशिक्षण, Video व्हायरल

प्रसाधनगृहाच्या दारावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा? हरयाणातील संतापजनक प्रकार, नेटकरी भडकले; Video व्हायरल

JNU मध्ये पुन्हा हिंसाचार! मध्यरात्री डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांत धुमश्चक्री; हाणामारी, दगडफेक, धावपळीत अनेकजण जखमी

ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला