राष्ट्रीय

मार्चमध्ये पेटणार वैशाख वणवा; हवामान खात्याचा इशारा

फेब्रुवारीत अंगाची लाहीलाही होत असतानाच मार्च महिना त्यापेक्षा अधिक भीषण असणार आहे. मार्चमध्ये देशात असामान्य व विक्रमी उन्हाळ्याचा त्रास सोसावा लागणार आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : फेब्रुवारीत अंगाची लाहीलाही होत असतानाच मार्च महिना त्यापेक्षा अधिक भीषण असणार आहे. मार्चमध्ये देशात असामान्य व विक्रमी उन्हाळ्याचा त्रास सोसावा लागणार आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशाच्या विविध भागात तापमान ४० अंशाच्या वर जाऊ शकते. मार्चसाठी ही बाब असामान्य आहे. कारण या महिन्यात भीषण गरमी पडणार आहे. दिवस व रात्री तापमान सामान्यापेक्षा अधिक राहणारआहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमान वाढ सुरू होईल. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अनेक राज्यांतील तापमान ४० अंशाच्या वर जाईल.

हवामानातील बदल, प्रदूषण, जंगलतोड, वाढते औद्योगिकीकरण यामुळे देशातील सरासरी तापमानात यंदा फेब्रुवारीपासूनच मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मार्च, एप्रिल, मे व जून महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता अधिकच वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत