@ANI
राष्ट्रीय

G20 Summit : महिलांच्या सहभागाशिवाय वैश्विक विकास शक्य नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जी-२० शिखर परिषदेच्या (G20 Summit) शेवटच्या दिवशी इंडोनेशियाने जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे सोपवले.

प्रतिनिधी

जी-२० शिखर परिषदेचा (G20 Summit) दुसरा आणि शेवटचा दिवस नुकताच पार पडला. यावेळी इंडोनेशियाने जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे सोपवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी जी-२० परिषदेची भारताच्या अध्यक्षतेखालील भूमिका स्पष्ट केली, तसंच महिला केंद्रीत विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली. भारत १ डिसेंबरपासून नवी दिल्ली येथे जी-२० गटाच्या नेत्यांची शिखर परिषद आयोजित करणार आहे. डिसेंबर महिन्यात उदयपूरमध्ये उद्घाटन होणार आहे. यावेळी राजस्थानमधील तीन शहरे या गटाचे आयोजन करणार आहेत. जयपूर, उदयपूर आणि जोधपूरमध्ये परिषद होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हंटले की, "भारताचे जी-२० अध्यक्षपद सर्वसमावेशक आणि महत्त्वाकांक्षी असेल. पुढील वर्षभरात आमचा प्रयत्न असेल की जी-२० सामूहिक कृतीला गती देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रमुख प्रवर्तक म्हणून काम करेल. जी-२० कडून जगाला आशा आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. १ डिसेंबरपासून भारत जी-२०चे अध्यक्षपद भूषवणार आहे." पुढे त्यांनी म्हंटले की, " जी-२० अजेंडामध्ये आपण महिला केंद्रीत विकासावर भर द्यायला हवा. यासोबतच शांतता आणि सुरक्षाही प्रदान करायला हवी. वैश्विक विकास महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नाही. कारण त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्यांना तंत्रज्ञानाचे फायदे घेता येणार नाही. यासाठी जी-२० मध्ये काम करायला हवे."

अतिवृष्टीमुळे आर्थिक संकट अधिक गडद

आजचे राशिभविष्य, २५ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय