बंगळुरू : कर्नाटक सरकारने शालेय विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका घरातून आणण्यास सांगितले आहे. आम्ही तुम्हाला केवळ प्रश्नपत्रिका देऊ, असे सरकारने सांगितले आहे.
पाचवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने सांगितले की, आम्ही तुम्हाला केवळ प्रश्नपत्रिका पुरवू, उत्तर पत्रिका तुम्ही घरून आणावी.
कर्नाटक राज्य शिक्षण व मूल्यांकन मंडळाने सर्व शाळांच्या हेडमास्टरना नवीन नियमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना कळवण्यास सांगितले आहे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर शिक्षकांसह, पालकांनी टीका केली असून विरोधकांनीही हल्लाबोल केला आहे.