राष्ट्रीय

काश्मीर घेतोय मोकळा श्वास : पंतप्रधान मोदी; कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच दौरा

जम्मू-काश्मीर हा केवळ एक प्रदेश नाही, तर तो भारताचा मुकुट आहे आणि त्यामुळेच...

Swapnil S

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हे २०१९ मध्ये रद्द करण्यात आल्यानंतर या प्रदेशाने विकासाबाबत नवी उंची गाठली असून हा प्रदेश आता मोकळेपणे श्वास घेत आहे. विकसित भारतासाठी विकसित जम्मू-काश्मीरला आमचे प्राधान्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे सांगितले.

कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केल्यानंतर मोदी प्रथमच येथे आले आहेत. काँग्रेस पक्ष दीर्घकाळ कलम ३७० बाबत केवळ जम्मू-काश्मीरमधील जनतेचीच नव्हे तर संपूर्ण देशाची दिशाभूल करीत होता, अशी टीकाही मोदी यांनी येथील एका जाहीर सभेत केली. यावेळी मोदी यांनी महाशिवरात्र आणि रमझाननिमित्त सर्वांना आधीच शुभेच्छा दिल्या. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरने जुने पाश तोडून टाकले आहेत, असेही मोदी यांनी ‘विकसित भारत, विकसित जम्मू-काश्मीर’ या मेळाव्यात बोलताना सांगितले.

या भागातील कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या जवळपास पाच हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद‌्घाटन केल्यानंतर मोदी म्हणाले की, श्रीनगरच्या जनतेची भेट घेतल्यानंतर आपल्याला अत्यंत आनंद झाला आहे. गुरुवारी समर्पित करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे जम्मू-काश्मीरच्या विकासाला चालना मिळेल. विकसित भारतासाठी विकसित जम्मू-काश्मीरला आमचे प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.

जम्मू-काश्मीर हा केवळ एक प्रदेश नाही, तर तो भारताचा मुकुट आहे आणि त्यामुळेच विकसित भारतासाठी आमचे विकसित जम्मू-काश्मीरला प्राधान्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

Thane : व्यावसायिक सिलिंडर दरवाढीमुळे उद्योग संकटात; खानावळी, छोटे स्टॉलधारक, पोळीभाजी केंद्रांचे गणित बिघडले

Pune : नसरापूर ४ वर्षीय चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे कोण? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

दिल्लीतील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

Mumbai : आता उद्यानांमध्ये मातांसाठी स्तनपान कक्ष; आराखडा तयार, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समावेश करणार

मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के