(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

ममतांनी सरन्यायाधीशांसमोर स्वत:च मांडली बाजू; न्यायालयाची सरकारला नोटीस; निवडणूक आयोग सोमवारी बाजू मांडणार

मतदारयाद्यांच्या विशेष तपासणीविरोधात (एसआयआर) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवाज उठवत बुधवारी स्वत: सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडली. ‘बंद दाराआड न्याय रडकुंडीला आला आहे, निवडणूक आयोगाकडून राज्याला लक्ष्य केले जात आहे आणि एसआयआरद्वारे बंगालच्या जनतेवर 'बुलडोझर' फिरवले जात असल्याचा युक्तिवाद ममतांनी केला.

Swapnil S

नवी दिल्ली : मतदारयाद्यांच्या विशेष तपासणीविरोधात (एसआयआर) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवाज उठवत बुधवारी स्वत: सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडली. ‘बंद दाराआड न्याय रडकुंडीला आला आहे, निवडणूक आयोगाकडून राज्याला लक्ष्य केले जात आहे आणि एसआयआरद्वारे बंगालच्या जनतेवर 'बुलडोझर' फिरवले जात असल्याचा युक्तिवाद ममतांनी केला. दरम्यान, बॅनर्जी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून त्याची सुनावणी सोमवारी होणार आहे.

ममता यांनी सरन्यायाधीश सूर्य कान्त यांच्याकडे पाच मिनिटे बोलण्याची अनुमती मागितली, तेव्हा सरन्यायाधीशांनी त्यांना १५ मिनिटांचा वेळ दिला. ‘आपल्याला कोठेही न्याय मिळत नाही, निवडणूक आयोगाला आपण सहा पत्रे लिहिली तरीही कोणतेही उत्तर त्यावर मिळालेले नाही. आयोगाने ५८ मतदारांना वगळले आहे. त्यांच्याकडे ‘फॉर्म ६’ही आहे, ते बंगालला लक्ष्य करीत आहेत, केवळ बंगालसाठी सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले आहेत’, असे ममता यांनी सूर्य कान्त, न्या. बागची आणि न्या. पांचोली यांच्यासमोर स्पष्ट केले.

आयोगाला नोटीस

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या याचिकेनंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोग येत्या सोमवारी आपले उत्तर निवडणूक आयोगापुढे सादर करणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी