राष्ट्रीय

मोदी सरकारचे उपेक्षितांकडे दुर्लक्ष; राजदच्या जनविश्वास रॅलीत राहुल गांधी यांचा आरोप

Swapnil S

पाटणा : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देशातील उपेक्षित घटकांकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे हा घटक लोकसंख्येतील ७३ टक्के इतका आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी पाटणा येथे राष्ट्रीय जनता दलाने आयोजित केलेल्या जनविश्वास रॅलीमध्ये बोलत हाेते.

भाजपचे नाव न घेता त्यांनी आरोप केला की, एक पक्ष लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आम्ही 'नफरत के बाजार में मोहब्बत' लोकांना देऊ करीत आहोत.

देशात शेतकरी, तरुण आणि दलितांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अग्निवीर भरती योजनेचा संदर्भ देत, ज्याच्या अंमलबजावणीला बिहारमध्ये विरोध झाला, वास्तविक हा उपक्रम देशातील तरुणांच्या विरोधात आहे, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी बोलताना दावा केला की, आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय गट सर्वाधिक जागा जिंकेल. विरोधी नेते ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या केंद्रीय एजन्सींना घाबरले नाहीत, ज्यांचा त्यांच्या विरुद्ध गैरवापर होत आहे. देशाच्या समृद्धीसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त