राष्ट्रीय

मोदींचे बजरंग बली निवडणूक आयोगाला चालते... माकपच्या सीताराम येचुरींची टीका

नवशक्ती Web Desk

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान 'जय बजरंग बली' सारख्या टिप्पण्या केल्या, परंतु विरोधी नेत्यांच्या त्यावर प्रतिक्रिया दिली तेव्हा निवडणूक आयोग गप्प राहिला, असे सांगत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आरोप केला की, जर विरोधी पक्षनेत्यांनी काही विधाने केली तर मात्र नोटीस आणि प्रक्रिया होतील.

येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, या देशातील संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल. त्याशिवाय देशाच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे रक्षण होऊ शकत नाही.

कर्नाटक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधानांनी मतदारांना जय बजरंग बली म्हणत मतदान करण्यास सांगितले. त्यावर निवडणूक आयोगाचा कोणताही आक्षेप नव्हता.

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत किंवा सुरू आहेत त्या परिस्थितीबद्दल, येचुरी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत आहे, तर भाजप उर्वरित भागात उलट वाऱ्याला सामोरे जात आहे. सध्या येचुरी सीपीएम पक्षाच्या निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी तेलंगणात आले आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त