राष्ट्रीय

मोदींचे बजरंग बली निवडणूक आयोगाला चालते... माकपच्या सीताराम येचुरींची टीका

कर्नाटक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधानांनी मतदारांना जय बजरंग बली म्हणत मतदान करण्यास सांगितले. त्यावर निवडणूक आयोगाचा कोणताही आक्षेप नव्हता.

नवशक्ती Web Desk

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान 'जय बजरंग बली' सारख्या टिप्पण्या केल्या, परंतु विरोधी नेत्यांच्या त्यावर प्रतिक्रिया दिली तेव्हा निवडणूक आयोग गप्प राहिला, असे सांगत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आरोप केला की, जर विरोधी पक्षनेत्यांनी काही विधाने केली तर मात्र नोटीस आणि प्रक्रिया होतील.

येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, या देशातील संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल. त्याशिवाय देशाच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे रक्षण होऊ शकत नाही.

कर्नाटक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधानांनी मतदारांना जय बजरंग बली म्हणत मतदान करण्यास सांगितले. त्यावर निवडणूक आयोगाचा कोणताही आक्षेप नव्हता.

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत किंवा सुरू आहेत त्या परिस्थितीबद्दल, येचुरी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत आहे, तर भाजप उर्वरित भागात उलट वाऱ्याला सामोरे जात आहे. सध्या येचुरी सीपीएम पक्षाच्या निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी तेलंगणात आले आहेत.

मुंबईत मलेरिया, डेंग्यूचे थैमान! डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २८ तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ; आजारांमुळे पालिका प्रशासनाची धावपळ

सिंहगडमध्ये 'अल्पसंख्याकांना प्रवेशबंदी'चा फलक; वादग्रस्त फलक पोलिसांनी हटवला, तपास सुरू

उद्धव ठाकरे म्हणाले, थोडं थांबा..आपले चांगले दिवस येणार! नाशिक महापालिकेतील नगरसेवकांशी ‘मातोश्री’वर खलबते

बोरघाटातील दुसरी लाईन दुरुस्त; आजपासून डेक्कन क्वीन, इंटरसिटी धावणार

उंच पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन नको! परवानगी न देण्यासाठी हायकोर्टाला साकडे