राष्ट्रीय

३७० कलम हटवण्याचे समर्थन करताना बहुसंख्यांकांच्या भावनिकतेतून संविधानाचा अर्थ लावू नये मोहम्मद अकबर लोन यांचा युक्तिवाद

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हा कधीही भारताशी पूर्णपणे जुळलेला प्रांत नव्हता, तसेच स्वातंत्र्यानंतर अन्य संस्थानांप्रमाणे जम्मू-काश्मीरला विलीनीकरण करारावर स्वाक्षरी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते. तेव्हा कलम ३७० हटवण्याची पाठराखण करताना घटनेचा अर्थ बहुसंख्यांकांच्या भावनेतून लावला जाऊ नये, असा युक्तिवाद नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अकबर लोन यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला.

याचिकाकर्ता लोन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद न्यायालयात लोन यांच्या वतीने मांडला. ते म्हणाले की, आपण इतिहासावर नजर टाकली तर जम्मू-काश्मीर हा प्रांत केव्हाही भारताशी संपूर्णपणे जुळला नव्हता हे लक्षात येर्इल. तेव्हा या राज्याची स्वतंत्र घटना होती, स्वत:ची प्रशासकीय आणि कार्यकारी व्यवस्था होती. तसेच भारताने या राज्याला विलीनीकरण करारावर स्वाक्षरी करा, असे कधीही सांगितले नव्हते. तसेच ३७० कलम हटवणे ही एक राजकीय प्रक्रिया होती. १९५७ साली जम्मू-काश्मीरची घटना समिती संपुष्टात आली तेव्हाचे कलम ३७० ला कायमस्वरूप प्राप्त झाले, असा तर्क सिब्बल यांनी घटनापीठासमोर व्यक्त केला. तेव्हा आपण घटनेचा अर्थ शब्दशा आणि संदर्भानुसार लावायला हवा. घटनेत स्तब्धता पाळलेल्या मुद्यावरून अर्थ लावता कामा नये, असेही सिब्बल यांनी यावेळी न्यायालयाला सांगितले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त