राष्ट्रीय

मुंबईकरांनी भाजपला दिला विक्रमी जनादेश; पंतप्रधान मोदींचे BMC निकालासंदर्भात आसाममधील जाहीर सभेत प्रतिपादन

पहिल्यांदाच, जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबईतील लोकांनी भाजपला विक्रमी जनादेश दिला. विजय मुंबईत झाला आहे आणि जल्लोष मात्र काझीरंगामध्ये होत आहे. महाराष्ट्रातील...

Swapnil S

गुवाहाटी : ‘महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील महापालिका निवडणुकांचे निकाल दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाले. या निवडणुकीत पहिल्यांदाच, जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबईतील लोकांनी भाजपला विक्रमी जनादेश दिला. विजय मुंबईत झाला आहे आणि जल्लोष मात्र काझीरंगामध्ये होत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमधील लोकांनी भाजपला सेवा करण्याची संधी दिली आहे’, असे उत्साहवर्धक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आसाममधील कालियाबोर येथे रविवारी एका जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.

पंतप्रधान म्हणाले की ईशान्येकडील सर्वात मोठे नेहमीचे दुःख हे अंतर राहिले आहे. अनेक दशकांपासून, येथील लोकांना असे वाटत होते की देशाचा विकास इतरत्र होत आहे आणि त्यांना मागे सोडले जात आहे. याचा परिणाम केवळ अर्थव्यवस्थेवरच नाही तर विश्वासावरही झाला. ते म्हणाले, ‘भाजपने ही भावना बदलण्याचे काम केले. डबल इंजिन सरकारने ईशान्येकडील विकासाला प्राधान्य दिले. रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्गांनी आसामला जोडण्याचे काम एकाच वेळी सुरू झाले, परंतु काँग्रेस पक्षाने कधीही त्याची पर्वा केली नाही. जेव्हा केंद्रात काँग्रेस सरकार सत्तेत होते तेव्हा आसामला रेल्वे बजेटचे तुटपुंजे बजेट मिळाले: सुमारे २००० कोटी रुपये. आता, भाजप सरकारने ते दरवर्षी अंदाजे १०,००० कोटी रुपये केले आहे.” असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

दुर्लक्षित आसामचा विश्वास भाजपने मिळविला

ईशान्य भारतासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, 'अंतर' ही या भागातील सर्वात मोठी समस्या राहिली आहे. अंतर केवळ भौगोलिकच नाही, तर मनामनांमध्येही होते. देशात एकाबाजूला विकास सुरू आहे आणि आम्ही मागेच राहत आहोत, ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, दशकभराहून अधिक काळ दुर्लक्षित राहिलेल्या या भागाचा विश्वास भाजपने ‘डबल इंजिन’ सरकारच्या माध्यमातून परत मिळवला आहे. तसेच, रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गांच्या माध्यमाने आसाम जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पूर्वी आसामचे रेल्वे बजेट केवळ २,००० कोटी रुपये होते, ते आता भाजपने वर्षाला १०,००० कोटी रुपयांपर्यंत नेले आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

मतदारांना हवेय सुशासन अन् विकास...

भाजप आज देशभरातील जनतेची पहिली पसंत बनला आहे. गेल्या दीड वर्षात देशाचा भाजपवरील विश्वास सातत्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या निवडणुकांच्या निकालांवरून. यावरून स्पष्ट होते की, देशातील मतदाराला आता केवळ 'सुशासन' आणि 'विकास' हवा आहे आणि भाजप विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असल्यानेच, जनता भाजपला पसंती देत आहे. याउलट, ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, तेथेच काँग्रेस चौथ्या-पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये, जनतेने २० वर्षांनंतरही भाजपला विक्रमी संख्येने मतदान केले, असे मोदी म्हणाले,

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये