@IAMINDIAN345/ X
राष्ट्रीय

झारखंडमध्ये मुंबई-हावडा मेलला अपघात; १८ डबे रुळावरून घसरले, दोघांचा मृत्यू, २० जण जखमी

Mumbai-Bound Howrah Express Accident: झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले असून त्यातील पाच जण किरकोळ जखमी झाले.

Swapnil S

जमशेदपूर : झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले असून त्यातील पाच जण किरकोळ जखमी झाले.

हावडा येथून सोमवारी रात्री निघालेली ही हावडा मेल जमशेदपूरहून ८० किमीवरील बाराबाम्बोजवळ सकाळी ३ वाजून ४५ वाजता घसरली. या मेलचे २२ पैकी १८ डबे रुळावरून उतरले. यातील बी-४ डब्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. जखमींना तत्काळ बाराबाम्बो येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने सांगितले की, जखमींना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आहेत. हा अपघात कशामुळे झाला? यामध्ये कोणाची चूक होती? याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली