@IAMINDIAN345/ X
राष्ट्रीय

झारखंडमध्ये मुंबई-हावडा मेलला अपघात; १८ डबे रुळावरून घसरले, दोघांचा मृत्यू, २० जण जखमी

Mumbai-Bound Howrah Express Accident: झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले असून त्यातील पाच जण किरकोळ जखमी झाले.

Swapnil S

जमशेदपूर : झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले असून त्यातील पाच जण किरकोळ जखमी झाले.

हावडा येथून सोमवारी रात्री निघालेली ही हावडा मेल जमशेदपूरहून ८० किमीवरील बाराबाम्बोजवळ सकाळी ३ वाजून ४५ वाजता घसरली. या मेलचे २२ पैकी १८ डबे रुळावरून उतरले. यातील बी-४ डब्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. जखमींना तत्काळ बाराबाम्बो येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने सांगितले की, जखमींना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आहेत. हा अपघात कशामुळे झाला? यामध्ये कोणाची चूक होती? याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी