@IAMINDIAN345/ X
राष्ट्रीय

झारखंडमध्ये मुंबई-हावडा मेलला अपघात; १८ डबे रुळावरून घसरले, दोघांचा मृत्यू, २० जण जखमी

Mumbai-Bound Howrah Express Accident: झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले असून त्यातील पाच जण किरकोळ जखमी झाले.

Swapnil S

जमशेदपूर : झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले असून त्यातील पाच जण किरकोळ जखमी झाले.

हावडा येथून सोमवारी रात्री निघालेली ही हावडा मेल जमशेदपूरहून ८० किमीवरील बाराबाम्बोजवळ सकाळी ३ वाजून ४५ वाजता घसरली. या मेलचे २२ पैकी १८ डबे रुळावरून उतरले. यातील बी-४ डब्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. जखमींना तत्काळ बाराबाम्बो येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने सांगितले की, जखमींना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आहेत. हा अपघात कशामुळे झाला? यामध्ये कोणाची चूक होती? याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...