@IAMINDIAN345/ X
राष्ट्रीय

झारखंडमध्ये मुंबई-हावडा मेलला अपघात; १८ डबे रुळावरून घसरले, दोघांचा मृत्यू, २० जण जखमी

Mumbai-Bound Howrah Express Accident: झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले असून त्यातील पाच जण किरकोळ जखमी झाले.

Swapnil S

जमशेदपूर : झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले असून त्यातील पाच जण किरकोळ जखमी झाले.

हावडा येथून सोमवारी रात्री निघालेली ही हावडा मेल जमशेदपूरहून ८० किमीवरील बाराबाम्बोजवळ सकाळी ३ वाजून ४५ वाजता घसरली. या मेलचे २२ पैकी १८ डबे रुळावरून उतरले. यातील बी-४ डब्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. जखमींना तत्काळ बाराबाम्बो येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने सांगितले की, जखमींना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आहेत. हा अपघात कशामुळे झाला? यामध्ये कोणाची चूक होती? याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

वारीसाठी पुणे पोलिसांची 'हायटेक' सुरक्षा व्यवस्था; एआय, ड्रोन, चेहरा ओळखणारी यंत्रणा, जीपीएस, सीसीटीव्हीसह आठ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा

West Bengal : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर; पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पळून जात होता

वसई-विरारदरम्यान रुळांवर पाणी; पश्चिम रेल्वेच्या लोकल ३० मिनिटे उशिराने

बीपीसीएल, विमा कंपनीने भरपाई द्यावी! आगीबाबत न्यायालयाने दिले निर्देश

राज्यात देवस्थान जमिनी हडपण्याचे मोठे रॅकेट कार्यरत; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा आरोप