ANI
राष्ट्रीय

...असे निर्णय देशाला परवडणारे नाहीत - राज ठाकरे

तज्ज्ञांना विचारून या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. कधी काहीतरी आणायचे, कधी बंद करायचे.

नवशक्ती Web Desk

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद केली आहे. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी धोरणाला धरसोड प्रकार म्हटले. नवीन नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हे पाहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली. शनिवारी नाशिक दौऱ्यावर असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “मी नोटाबंदीच्या वेळी भाषण केले होते. हा एक प्रकारचा धरसोड करण्याचा प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. कधी काहीतरी आणायचे, कधी बंद करायचे. त्यावेळी नोटा आणल्या तर त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजेच नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही पाहिले नव्हते.

असे निर्णय देशाला परवडणारे नाहीत. आता पुन्हा लोक बँकेत पैसे जमा करायचे. यातून पुन्हा नव्या नोटा येतील. असे प्रयोग परवडणारे नसतात, असे राज ठाकरे म्हणाले.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

शहाड उड्डाणपूल १८ दिवसांसाठी बंद; १५ ऑक्टोबरपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार